शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

स्वरगीत यात्रेतून मराठी महिला गीतकार, संगीतकार आणि कवयित्रींना अनोखी मानवंदना

By अनिकेत घमंडी | Updated: March 10, 2024 14:59 IST

स्वरगीत यात्रेने रसिक डोंबिवलीकरांना घडवली महिला गीतकार, संगीतकार आणि कवयत्रिंच्या रचनांची अनोखी सफर

डोंबिवली : संत जनाबाईंच्या ओव्यांपासून ते आजच्या काळातल्या कवयित्रींच्या कवितांपर्यंतच्या विविध गाणी रसिकांना जुन्या काळात घेऊन गेली. ऋषिकेश रानडे यांनी तोच चंद्रमा नभात, नको देवराया, शूर आम्ही सरदार, मना घडवी संस्कार, शोधिसी मानवा यासारख्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने रसिक तल्लीन झाले. जागतिक महिला दिनाच्या ओचित्याने मराठीतील महिला कवयित्री, गायिका आणि संगीतकार यांच्या रचनांची सुरेल मैफिल " स्वरगीत यात्रा " या कार्यक्रमात डोंबिवली येथे रंगली. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शैक्षणिक निधीसंकलनाकरीता आयोजित करण्यात येणाऱ्या अमृतोत्सव या सहा कार्यक्रमांच्या शृंखलेतील चौथ्या पुष्पाचे आयोजन शनिवारी सावित्रीबाई रंगमंदिरात करण्यात आले होते. 

विठू माझा लेकूरवाळा या गाण्याच्या सादरीकरणाने शरयू दाते हिने कार्यक्रमाची सुरूवात केली आणि ये सखये जवळी घे, निळ्या आभाळी, काय बाई सांगू, परिकथेतील राजकूमारा, बाई बाई मनमोराचा अश्या विविध गाण्यांचे आपल्या गोड आवाजात सादरीकरण केले. तर संपदा माने यांनी खोप्यामध्ये खोपा, माय भवानी तुझी लेकरे, आळविते मी तुला, मयुरा रे, नको नको रे पावसा, कशी या त्यजू पदाला, सजणा कशाशी अबोला या सारख्या उपशास्त्रीय आणि नाट्यसंगितातील विविध गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची सर्व सुत्रे हि महिलांनी सांभाळली. दिपप्रज्वलन म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर, लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, कार्यक्रमाच्या निवेदिका डॅा समिरा गुजर-जोशी, गायिका संपदा माने, शरयू दाते, व्हॅायलिन वादक श्रुती भावे आणि किबोर्ड वादक दर्शना जोग या सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्या सोनाली गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर मंडळातर्फे सुत्रसंचलन जाई वैशंपायन यांनी केले. 

मध्यांतरापुर्वी श्रुती भावे यांनी आपल्या व्हॅायलीनवर काटा रूते कुणाला हे नाट्यगीत सादर केले आणि रसिकांना भावविवश केले. त्यांच्या अप्रतिम आणि प्रतिभाशाली सादरीकरणाने भारावून जाऊन म्हैसकर फाऊंडेशनच्या श्रीमती सुधाताई म्हैसकर यांनी रूपये २१,०००/- रक्कमेचा पुरस्कार जाहीर केला. 

अत्यंत आभ्यासपूर्ण आणि सखोल विवेचनातून डॅा समिरा गुजर जोशी यांनी ही महिला गीतकार, संगीतकार आणि कवयित्री यांना मानवंदना देणारी स्वरगीत यात्रा रसिकांना घडवली. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि कार्यक्रमाचे संगीत संयोजन हे सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत संयोजक श्री कमलेश भडकमकर यांनी केले होते. किशोरी आमोणकर यांच्या बोलावा विठ्ठल या शरयू दाते यांनी गायलेल्या अभंगानंतर कार्यक्रमाची सांगता संपदा माने यांच्या अवधा रंग एक झाला या भैरवीने झाली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीWomenमहिला