शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

एक चिंगारी करू शकते नुकसान भारी! अग्निशमनबाबत कल्याणात सायकल रॅलीद्वारे जनजागृती

By प्रशांत माने | Updated: April 6, 2025 11:46 IST

रविवारी अग्निशमन विभागातर्फे सायकल रॅली काढण्यात आली

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: १४ ते २० एप्रिल हा सर्वत्र अग्निशमन सप्ताह पाळला जातो. परंतू केडीएमसीने त्याआधीच मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहसंकुल, शाळांसह, मनपाच्या विविध विभागातील कर्मचा-यांमध्ये अग्निशमनबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासह त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी अग्निशमन विभागातर्फे सायकल रॅली काढली होती.

केडीएमसीचे सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव, ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी रॅलीला झेंडा दाखविला. रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन, कल्याण पूर्व सायकलिस्ट असोसिएशन, डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन, पलावा सायकलिस्ट असोसिएशन, हिरकणी सायकल ग्रुप आदी सायकल संघटनांच्या २०० सदस्यांसह अनेक हौशी सायकलपटूही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये प्रोफेशनल सायकलिस्टसोबतच महिला आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

...तर लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा

आपातकालीन परिस्थितीत लिफ्टऐवजी जिन्याच्या वापर करा, आपली सुरक्षा आपला अधिकार, एक चिंगारी करू शकते नुकसान भारी, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवा असे जनजागृतीपर फलक रॅलीतील सायकलवर लावले होते.

अग्निशमन मुख्यालय परिसरात समारोप

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी अग्निशमन मुख्यालयापासून सुरू झालेली रॅली लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी चौक, पुन्हा अग्निशमन मुख्यालय अशी काढली होती. अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तिका तयार केली असून त्यात अग्नीसुरक्षेबाबत सखोल माहिती दिली आहे. या पुस्तकांच्या ५ हजार प्रती छापल्या असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायटयांमध्ये त्याचे वाटप होणार आहे अशी माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी चौधरी यांनी दिली.

उच्च प्रतीची इलेक्ट्रीक वायर वापरा

आग लागल्यास १०१ क्रमांकावर संपर्क करावा, लिफ्टचा वापर करू नये जिन्याचा वापर करावा, आगीमुळे धुर वाढल्यास टॉवेल आणि रूमाल ओला करून चेह-यावर लावावा, घरात उच्च प्रतीची वायर वापरावी, अग्निशमन उपकरणांची माहीती रहिवाशांना असावी असे आवाहन मनपा सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांनी केले.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल