शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

कचरा व्यवस्थापन  क्षेत्रातील भव्य यशाचे प्रारूप; वैशाली स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:18 IST

वैशाली यांनी २०१०च्या आसपास साकीनाका येथील एमएसएमईमधून ‘गोल्ड अप्रायजल’ नावाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

- सचिन सागरेलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नाटकात अभिनय करायची आवड असल्याने विद्यापीठातल्या अनेक एकांकिकामध्ये तिने अभिनय केला. तिच्या अभिनयाचं कौतुक व्हायचे. पण, लेकीचा हा अभिनयाचा मार्ग तिच्या आईवडिलांना पसंत नव्हता. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच तिचे लग्न लावून दिले आणि अभिनय, शिक्षण सारे काही थांबले. एकल मातृत्व नशिबी आल्यावर परिस्थितीशी दोन हात केले. प्रचंड कष्ट, अविरत संघर्ष, हार न मानण्याची वृत्ती आणि सातत्य यामुळेच पुरुषांचे प्राबल्य असणाऱ्या ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील वैशाली स्वरूप पहिल्या महिला उद्योजिका ठरल्या आहेत.

वैशाली यांनी २०१०च्या आसपास साकीनाका येथील एमएसएमईमधून ‘गोल्ड अप्रायजल’ नावाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सोन्याच्या शुद्धिकरणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यावर कुर्ला येथे शुद्धिकरणाचा कारखाना सुरू केला. दुर्दैवाने कारखाना तोट्यात गेला. यातून बाहेर पडण्यासाठी एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. दहा वर्षे शैक्षणिक संस्थेत काम केल्यावर कचरा व्यवस्थापन करणाऱ्या एका गुजरातच्या कंपनीत नोकरी मिळाली. संवाद कौशल्य आणि भाषेतला गोडवा यांमुळे भारतभर मार्केटिंगचे काम त्यांना करावे लागले. त्यामुळे, ई-वेस्ट रिसायकलिंग क्षेत्रातले त्यांचे ज्ञान चांगलेच वाढली. त्यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. 

ई-वेस्ट रिफायनरी क्षेत्रातील त्या पहिल्या महिला उद्योजक होत्या. शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी ही उद्योगिनी कधीही कोणाही पुढे न झुकता आणि लक्ष न देता फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिली. त्यामुळेच आज इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ई-वेस्ट रिसायकलिंग अँड रिफायनरीमध्ये महाराष्ट्रातील पहिली कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. 

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून वैशाली यांना महिला उद्योजिका घडवायच्या आहेत. देशभरात ई-कचरा संकलन करणारी केंद्रे उभारण्याचादेखील त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांचे काम सुरू आहे. विद्यार्थी हे उद्याचा देश घडवत असतात. त्यामुळे, या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्या व्याख्यानदेखील देतात. अनेक महाविद्यालयांतर्फे त्यांना बोलावण्यात येते. तसेच काही शाळा आणि महाविद्यालयातर्फे त्यांच्या फॅक्टरीवर उद्योग प्रशिक्षण आणि सामाजिक जागरूकता कार्यक्रम होत असतात. 

सातारा येथील माण तालुक्यात त्यांनी आपल्या काही विश्वासू लोकांच्या सहकार्याने कंपनीची स्थापना केली. लॉजिस्टिक, ऑपरेशन टीम, लॅब टेक्निशियन, मार्केटिंग अशा विभागांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. भारतातल्या अनेक  राज्यांत त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे.