शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाजसेवेचा वसा घेत १७ सायकलपटुंची अकराशे किलोमीटर सायकलवारी

By सचिन सागरे | Updated: December 9, 2023 12:28 IST

कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे साहीर शेख यांच्या पुढाकाराने सायकलपटू एकत्र आले.

कल्याण : समाजाप्रती असणारी आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी १७ सायकलपटू अकराशे किलोमीटरच्या सायकलवारीसाठी आज पहाटे रवाना झाले. कल्याण पाशिमेकडील दुर्गाडी चौकापासून कर्नाटकामधील कूर्ग येथे निघालेल्या या सायकलपटुंना केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी झेंडा दाखवत रवाना केले. या सायकलवारीच्या माध्यमातून जमा झालेला निधी पैशांअभावी उपचार रखडलेल्या, वैद्यकीय सेवा मिळू न शकलेल्या गरजू कुटुंबीयांना दिला जाणार आहे. या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे साहीर शेख यांच्या पुढाकाराने सायकलपटू एकत्र आले. मग त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सायकलवारीला प्रारंभ झाला. गेली चार वर्षे हे सर्व सायकलपटू सामाजिक भान ठेवत विविध राज्यातील भागात सायकल रॅली काढत असल्याची माहिती सहभागी सायकलपटू डॉ. रेहनूमा यांनी दिली. या सर्व १७ सायकलपटुंसमोर पुढील सात दिवसांत कल्याण ते कूर्ग हे अकराशे किमी अंतर कापण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे, दररोज साधारणपणे दोनशे किलोमीटरचे अंतर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे साहीर यांनी सांगितले. या सायकलपटुंचा उत्साह वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील विविध सामाजिक संस्था आणि त्यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष असून याआधीही सामाजिक बांधिलकी जपत ही सायकलवारी संपन्न झाली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCyclingसायकलिंग