शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:53 IST

मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्ममार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

आपल्या आजूबाजूला नेहमीच अशा घटना घडत असतात, ज्यांबाबत आपण नेहमीच ऐकत-बघत असतो. काहीवेळा आपल्याला या घटनांबाबत अनेकदा माहिती मिळते, तर अनेकदा त्यांची माहिती रहस्य बनून राहते. आज आम्ही तुम्हाला एका अशाच विषयाबाबत माहिती देणार आहोत. हे सर्वांनाच माहीत आहे की, मृत्यूनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जातं. अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल. त्यांचं पोस्टमार्टम केलं जातं. पण मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

काय आहे याचं कारण

इथे हे समजून घेणं फार गरजेचं आहे की, पोस्टमार्टम एकप्रकारचं ऑपरेशनच आहे. याद्वारे मृतदेहांचं परीक्षण केलं जातं. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतलं जातं की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. मीडिया रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर मृत्यूनंतर सहा ते १० तासांच्या आत पोस्टमार्टम करणं अनिवार्य आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होऊ लागतात. असंही सांगितलं जातं की, सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण केलं जात नाही.

हे आहे महत्वाचं कारण

ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसू लागतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही. असं मानलं जातं की, जर जखमेचा रंग लाल ऐवजी आणखी कोणता दिसत असेल तर त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही. कारण त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असं काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीहीच चूक राहू नये म्हणून हे केलं जातं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके