शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एक असा समाज ज्यात महिलांच्या गळ्यात रिंग घालून लांब केली जाते मान, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:36 IST

या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या मान्यता असतात. काही देशांमध्ये आजही काही समाज प्राचीन मान्यतांचं पालन करतात. असाच एक समाज म्यानमारमध्ये आहे. या समाजातील महिलांची मान सामान्यापेक्षा लांब असते. येथील महिला आपल्या गळ्यात धातुच्या रिंग घालतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे शेकडो पर्यटक इथे येतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. या महिलांना बघून लोक थक्कही होतात. पण या महिला अशा रिंग गळ्यात का घालतात? असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

अल जजीरा न्यूज वेबसाईटनुसार, म्यानमारच्या कायन जमातीमधील महिला गळ्यात पितळेच्या रिंग घालतात. एका रिंग एकावर एक घातल्या जातात. लहानपणापासून या रिंग घातल्यामुळे त्यांच्या मानेचा आकार बारीक आणि लांब होतो. 

काय आहे यामागचं कारण?

या समाजातील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, महिलांची मान जेवढी बारीक आणि लांब असेल त्या तेवढ्या जास्त सुंदर दिसतात. या रिंग वजनी असतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा ही प्रथा सुरू झाली होती तेव्हा असं मानलं जात होतं की, महिलांची मान लांब असेल तर त्या बेढब दिसतील आणि दुसऱ्या समाजातील लोक त्यांचं अपहरण करणार नाही. अशाप्रकारे त्या स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात. 

एक मान्यता अशीही आहे की, ज्या गावांमध्ये हे लोक राहतात, तिथे वाघांची संख्या जास्त आहे. वाघ नेहमीच लोकांवर हल्ला करतात. हल्ला करत असताना वाघ सगळ्यात आधी मनुष्याच्या मानेवर हल्ला करतात. त्यामुळे येथील महिला वर्षानुवर्षे धातुच्या रिंग आपल्या गळ्यात घालतात.

मुली ५ ते ६ वयाच्या झाल्या की, त्यांना रिंग घालण्यास सांगितलं जातं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या रिंग खूप महागही असतात. यांची किंमत २० हजार रूपयांपर्यंत असते. आजकाल बऱ्याच मुली रिंग घालत नाहीत. पण परंपरा टिकवून ठेवण्यासाठी महिला या रिंग घालतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके