शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:09 IST

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं.

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं. नामस्मरण करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक म्हणजे, जपाची माळ. देवाचं नामस्मरण करताना 108 मण्यांची जपमाळ वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? ही माळ फक्त 108 मण्यांचीच का असते? जाणून घेऊया जपमाळेत फक्त 108 मणीच का असतात त्याबाबत... 

जप पूर्ण होणं हे मंत्रजपाची संख्या आणि हवनातील आहुतीच्या संख्येवर अवलंबून असते. जपमाळ कोणतीही असो, त्यामध्ये 108 मणी असतात. अनेकदा आपण हे ऐकतो. पण कधी विचार केला नसेल. 

अनेक मोठे साधू संतही आपल्या नावापुढे श्री श्री 108 चा वापर करतात. त्रिदेवांची आराधना करतानाही 108 नावांचा जप करण्यात येतो. यामागे वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि ज्योतिषीय कारणं आहेत. जाणून घेऊया या कारणांबाबत सविस्तर... 

आपल्या कालगणनेमध्ये सूर्याला फार महत्त्व आहे. एका वर्षात सूर्य 12 राशींमध्ये फिरून 360 अंश पूर्ण करतो. याच 360 अंशांना 60 ने गुणल्यास 21600 कला पूर्ण होतात. या कला दोन आयनांमध्ये पडतात. पहिल्या सहा महिन्यांमध्ये सूर्याचे दक्षिणायन आणि पुढिल सहा महिन्यांमध्ये सूर्याचं उत्तरायन असते. एका आयनात 21 हजार 600च्या अर्धे म्हणजेच, 10 हजार 800 कला येतात. 

तसेच, सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापर्यंत 60 घडी होतात. एका घडीत 24 मिनिटं असून एका घडीत 60 पळ आणइ एका पळात 60 विपळ असतात. अर्थातच 24 तास किंवा 60 घडीत 60 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजेच 21 हजार 600 विपळ असतात. अर्थात अर्ध्या दिवसात, 12 तासात 10 हजार 800 विपळ येतात. जर शेवटचे दोन शून्य सोडले तर वर्ष आणि दिवसाच्या सूर्य संचाराच्या एकूण संख्येत 108 उरतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक