शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पावसात विजा कडकडतात पण आकाशातून जाणाऱ्या विमानाला शॉक बसत नाही, कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:37 IST

अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

जगात मानवी प्रवासाचा सगळ्यात वेगवान मार्ग म्हणजे हवाई वाहतूक. ऊन, थंडी, वारा अशा गोष्टींवर मात करत विमानं प्रवास करतात. अशा विमान प्रवासावर प्रभाव टाकणारा ऋतु म्हणजे पावसाळा. अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर याचं उत्तर आहे नाही. कोरा या प्रश्नोत्तराच्या साईटवर या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

विमानाला शॉक न बसण्याचं कारण, विमानाचे बाहेरचे आवरण विद्युतवाहक धातूचे असते. शिवाय थोडे खाली अशाच धातूचे जाळे बसवलेले जाते असते. विमानाचा आकार पुढे आणि मागे निमुळता असतो. वादळात चमकणाऱ्या वीजांचा विमानाला स्पर्श झाल्यावर विद्युत प्रवाह बाहेरच्या बाहेर विमानाच्या नाकाच्या, शेपटीच्या आणि पंखांच्या टोकांपर्यंत नेला जातो व तिथून आसमंतात परत जातो. त्यासाठी विमानाच्या टोकांवर वीज आकाशात सोडणारे discharger wicks बसवलेले असतात. विमानाच्या बाह्य आवरणातून विजेला आत यायला रस्ताच नसतो. हे उच्च कोटीचे इंजिनियरिंग असते आणि याची कसोशीने तपासणी होते.

विमानाचा विजेपासून बचाव हा त्यावर लावलेल्या कडेकोट आवरणावर अवलंबून आहे. आणि त्याची कसोशीने तपासणी महत्त्वाची आहे. आवरणामुळेच विमान सुरक्षित राहते. तसेच नाजुक उपकरणे, होकायंत्र हे देखील सुरक्षित राहतात.सिडीटी

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेairplaneविमानelectricityवीज