शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे प्लॅटफॉर्म तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवून मिळते एन्ट्री, कुठंय हे स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:09 IST

Railway Interesting Facts: आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथे प्लॅटफॉर्म तिकीट दाखवून नाही तर पासपोर्ट दाखवून एन्ट्री मिळते.

Railway Interesting Facts: भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची आपली एक वेगळी खासियत आहे. या स्टेशन्सचे अनेक किस्से नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्याला माहीत असेलच की, एखाद्या स्टेशनवर जाण्यासाठी एकतर आपल्याकडे रेल्वेचं तिकीट हवं असतं, नाही तर मग प्लॅटफॉर्म तिकीट हवं असतं. पण आज आम्ही आपल्याला देशातील एका अशा रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, जिथे प्लॅटफॉर्म तिकीट दाखवून नाही तर पासपोर्ट दाखवून एन्ट्री मिळते. महत्वाची बाब म्हणजे हे देशातील शेवटचं रेल्वे स्टेशनही होतं आणि सुरक्षेच्या दृष्टीने इथे प्रवाशांचा पासपोर्ट चेक केला जात होता.

भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन

आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन अटारी रेल्वे स्टेशन आहे. जे पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेवर आहे. हे रेल्वे स्टेशन ऐतिहासिक रूपाने समझोता एक्सप्रेससाठी ओळखलं जातं होतं. इथे पाकिस्तानी व्हिसा आणि पासपोर्टची गरज पडत होती. पण आता ही येथील सेवा बंद आहे. इथे सुरक्षा व्यवस्थाही फार होती आणि जर विना कागदपत्र इथे पकडले गेले तर फॉरेन अॅक्टनुसार केसही दाखल होत होती.

का बंद झाली समझोता एक्सप्रेस?

असा दावा केला जातो की, १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करारादरम्या समझोता एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय झाला. २२ जुलै १९७६ मध्ये अटारी आणि लाहोर दरम्यान ही एक्सप्रेस सुरू झाली. आधी ही एक्सप्रेस रोज होती. पण १९९४ मध्ये आठवड्यातून केवळ दोन दिवस चालवली जात होती. पण २०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली. त्यावेळी भारतीय रेल्वेचे ११ डबे लाहोरमध्ये होतो, जे आजही तिथेच अडकून आहेत. तर पाकिस्तानी रेल्वेचेही १६ डबे आजही भारतातील अटारी रेल्वे स्टेशनवर आहेत.

भारतातील इतर अनोखे स्टेशन

भारतात अनेक रेल्वे स्टेशनची आपली एक वेगळी खासियत आहे. जसे की, वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा हे सगळ्यात लांब नाव असलेलं रेल्वे स्टेशन आहे आणि बांसपानी छोटं नाव आणि प्लॅटफॉर्मसाठी फेमस आहे. तसेच राशिदपुरा खोरी हे रेल्वे स्टेशन गावातील लोकच चालवतात. इथे प्रवाशांना एक वेगळाच अनुभव मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Attari: Indian railway station where passport grants entry, not ticket.

Web Summary : Attari, India's last railway station on the Pakistan border, once required passports for entry due to the Samjhauta Express. Service stopped; unique stations exist.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके