शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टेलीफोन कनेक्शन मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण, काय होता त्यांचा फोन नंबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:04 IST

Telephone Facts : भारतात टेलीफोन कधी आला आणि टेलीफोन घेणारी पहिली व्यक्ती कोण होती? किंवा त्यावेळी पहिल्या फोनचा नंबर काय होता? क्वचितच कुणाला या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील.

Telephone Facts : टेलीफोनचा जमाना आता मागे पडलाय. पण यांचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही. टेलीफोनची जागा आता मोबाईलने घेतली आहे. म्हणजे आता तर घरातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन असतो. पण आपल्याला माहीत आहे का की, भारतात टेलीफोन कधी आला आणि टेलीफोन घेणारी पहिली व्यक्ती कोण होती? किंवा त्यावेळी पहिल्या फोनचा नंबर काय होता? क्वचितच कुणाला या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील. आज आपण याचा प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.

भारतात टेलीफोन कधी आला? 

भारतात टेलीफोन १८८१ मध्ये ब्रिटिश सत्ता असताना आणला गेला. इंग्लंडमधील एका खाजगी कंपनीने भारतातील तीन शहरांमध्ये एकाचवेळी तीन टेलीफोन एक्सजेंच सुरू केले. ह कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये सुरू केले होते. ही सेवा मुख्यपणे प्रशासनावर नियंत्रण, व्यापार आणि सैन्य संवादासाठी सुरू केली होती. कोलकातामध्ये २८ जानेवारी १८८२ मध्ये ही सेवा सुरू झाली. यात पहिल्या भारतीय व्यक्तीचा ५० कनेक्शनमध्ये समावेश करण्यात आला. ही टेलीफोन कनेक्शन मिळवणारी पहिली व्यक्ती ठरली.

भारतात जेव्हा पहिलं एक्सचेंज कोलकाता येथे सुरू झालं तेव्हा याची क्षमता फार जास्त कनेक्शनची नव्हती. याची क्षमता ९३ टेलीफोन कनेक्शन सांगण्यात येते. अशात इंग्रजांनी सुरूवातीलाच कुण्या भारतीयाला कनेक्शन देण्याचा विचार केला नव्हता. पण एक भारतीय असा होता ज्याला कनेक्शन देण्यात आलं. पण ते मिळणंही सोपं नव्हतं.

पहिला टेलीफोन मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती

भारतात टेलीफोन सेवा सुरू झाल्यावर बाबू सागर दत्त नावाच्या व्यक्तीला कनेक्शन देण्यात आलं होतं. दत्त हे एक १९ व्या शतकातील एक प्रसिद्ध बंगाली व्यापारी, उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती होते. ते भारतातील सुरूवातीच्या आधुनिक व्यापाऱ्यांपैकी एक होते. इतिहासात त्यांच्या नावाची नोंद या कारणानेही आहे की, ते भारतात टेलीफोन घेणारे पहिले भारतीय होते.

सागर दत्त हे मीठ, कापड आणि इतरही व्यापार करत होते. त्यावेळी कोलकाता शहर ब्रिटिश भारताची व्यवसायाची राजधानी होतं. भारतीय उद्योजकांचा एक नवा वर्ग समोर येत होता. सागर दत्त हे याच वर्गाचे प्रमुख प्रतिनिधी होते. यूरोपीय कंपन्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध होते. 

टेलीफोन नंबर किती होता?

बाबू सागर दत्ता यांचं घर कोलूटोला भागात होतं. त्यांचा टेलीफोन नंबर ५० होता. तेव्हा टेलीफोन नंबरची सिस्टीम आजच्या तुलनेत सरळ आणि इंटरेस्टिंग होती. भारताचा पहिला टेलीफोन एक्सचेंज कोलकातामधील डलहौजी स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आलं होतं.

१८८२ मध्ये फोन नंबर फार कमी आकड्यांचे असायचे. या एक्सचेंजमध्ये एकूण ५० ग्राहक होते. त्यामुळे टेलीफोनचे नंबरही १ ते ५० असेच होते. नंबर १ एक्सचेंजचा होता. २ नंबर सरकारी कार्यालय. १५ नंबर एका कंपनीच्या ऑफिसचा होता, तर सागर दत्त यांचा नंबर ५० होता.

तेव्हा कसा लावला जात होता फोन?

त्यावेळी जेव्हा कुणाला फोन करायचा होता, तेव्हा फोनचं रिसिव्हर उचलताच टेलीफोन एक्सचेंजची रिंग वाजत होती. तेव्हा ऑपरेटरला सांगावं लागत होतं की, आपल्याला कोणत्या नंबरवर बोलायचं आहे. तेव्हा ऑपरेटर तो नंबर कनेक्ट करत होता. त्यावेळी आजसारखी ऑटोमॅटिक डायलिंग नव्हती. 

English
हिंदी सारांश
Web Title : First Indian to get a phone connection: Who was he?

Web Summary : In 1881, telephone service began in India. Babu Sagar Dutt, a Kolkata businessman, was the first Indian to get a connection; his number was 50. Early phones required operator assistance to connect calls.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके