शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या देशांमध्ये आहे जगातील सगळ्यात स्वच्छ गुणवत्तेचं पाणी, याबाबत भारताचा नंबर कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:15 IST

World Cleanest Water : एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये कोणत्या देशातील पाणी सगळ्यात जास्त स्वच्छ असतं, हे सांगण्यात आलं आहे. पाण्याच्या स्वच्छतेची टक्केवारी ठरवण्यात आलीये.

World Cleanest Water : पाणी हे जीवन आहे. सगळ्यांनाच रोज प्यायला स्वच्छ पाणी लागतं. बरेच असे देश आहेत जिथे पिण्याचं १०० टक्के स्वच्छ पाणी मिळतं. बऱ्याच देशात पाणी स्वच्छ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि पर्यावरणासंबंधी कठोर नियम पाळले जातात. तर बरेच देश असे आहेत जिथे प्रदूषण खूप आहे आणि पाण्याची गुणवत्ताही खूप बेकार आहे. एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये कोणत्या देशातील पाणी सगळ्यात जास्त स्वच्छ असतं, हे सांगण्यात आलं आहे. या यादीत भारत कोणत्या नंबरवर आहे हेही सांगण्यात आलंय. चला तर पाहुयात कुठलं पाणी सगळ्यात स्वच्छ आहे. 

सगळ्यात स्वच्छ पाणी कुठलं?

एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्सनुसार, फिनलँड आणि आइसलँड या दोन देशांना सुरक्षित आणि स्वच्छ पाण्यासाठी १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. हे दोन्ही देश स्वच्छ पाण्यासाठी जागतिक स्तरावर सगळ्यात वरच्या नंबरवर येतात. या देशांनी पाणी स्वच्छ करण्यासाठी खूप आधुनिक अशी सिस्टीम तयार केली आणि पर्यावरणासंबंधी नियमांचं काटेकोर पालनही केलं जातं. त्यानंतर नंबर लागतो तो ब्रिटनचा आणि मग स्वित्झर्लॅंड या देशांचा. येथील पाणीही खूप स्वच्छ आहे.

सिंगापूर आणि कॅनडात काय?

आशियाई देशांमध्ये सिंगापूर पाण्याच्या नियोजनात खूप पुढे आहे. कमी नैसर्गिक संपत्ती असूनही या देशाने नेहमीच स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी अॅडव्हान्स रीसायकलिंग सिस्टीम इथे उभारली आहे. कॅनडा  सुद्धा टॉप देशांमध्ये सहभागी आहे. याचं श्रेय त्यांच्या विशाल ताज्या पाण्याच्या भांडाराला आणि पर्यावरणाच्या मजबूत सुरक्षेला जातं. जगातील ताज्या पाण्याचा स्त्रोतांचा पाचवा भाग इथेच आढळतो.

भारताची स्थिती काय?

वैश्विक पाण्याच्या गुणवत्तेच्या रँकिंगमध्ये भारताची स्थिती चिंताजनक आहे. २०२४ च्या एनव्हायर्नमेंटल परफॉर्मेन्स इंडेक्समध्ये भारतात १८० देशांमध्ये १७६ व्या स्थानावर आहे. यामुळे भारत पर्यावरण आरोग्याबाबत सगळ्यात बेकार प्रदर्शन करणारा देश ठरतो. 

स्वच्छ पाण्यासाठी भारताचं रँकिंग खूप कमी असण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. नद्यांमध्ये प्रदूषण, घाण पाणी रीसायकल करण्यासाठी कमी सुविधा अशा कारणांचा यात समावेश होतो. लाखो लोकांना अजूनही त्यांच्या घरांपर्यंत सुरक्षित पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना दूषित किंवा दूरच्या स्त्रोतांवर अवलंबून रहावं लागतं. इतकी आव्हानं असूनही भारतात जगातील सगळ्यात स्वच्छ उमनगोट नदी आहे. मेघालयाच्या डाउकीमधील ही नदी इतकी स्वच्छ आहे की, त्यावर होडी तरंगताना दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : World's Cleanest Water: Which countries rank highest? Where does India stand?

Web Summary : Finland and Iceland top the list for cleanest water. India ranks low due to pollution and poor recycling, despite having the pristine Umngot River.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सwater pollutionजल प्रदूषणWaterपाणीJara hatkeजरा हटके