शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतात 'इथे' सगळे भाऊ एकाच तरूणीशी करतात लग्न, कारण काय आणि कसा चालतो त्यांचा संसार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:49 IST

Marriage Tradition : भारतात एक असं ठिकाण आहे जिथे परिवारातील सगळे भाऊ एकाच महिलेशी लग्न करतात. अजूनही ही परंपरा काही भागांमध्ये पाळली जाते. पाहुयात कुठे आहे ही प्रथा आणि कशी केली जाते.

Marriage Tradition : काही दिवसांआधी इंडोनेशियामधून एक बातमी समोर आली होती की, इथे एका महिलेने दोन खास मित्र असलेल्या पुरूषांसोबत एकत्रच लग्न केलं. यासाठी तिला घरातूनही पाठिंबा होता. महत्वाची बाब म्हणजे हे तिचं दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नातून तिला दोन मुलंही होती. आपण बघतो की, भारतात सामान्यपणे एक व्यक्ती एकाच व्यक्तीसोबत लग्न करतो. म्हणजे तशी आपल्याकडे प्रथा आहे. महाभारतातील द्रोपदीबाबतही आपल्याला माहिती असेल की, तिने सुद्धा पाच पांडवांसोबत लग्न केलं होतं. पण जर आपल्याला कुणी सांगितलं की, आजच्या काळातही असं होत असेल तर विश्वास बसणार नाही. भारतात एक असं ठिकाण आहे जिथे परिवारातील सगळे भाऊ एकाच महिलेशी लग्न करतात. अजूनही ही परंपरा काही भागांमध्ये पाळली जाते. पाहुयात कुठे आहे ही प्रथा आणि कशी केली जाते.

कुठे आहे लग्नाची ही अनोखी प्रथा?

काही महिन्यांआधी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांनी एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. हे लग्न वेगवेगळ्या रितीरिवाजांसोबत अनेक दिवस चाललं होतं. मोठ्या प्रमाणात लोक या लग्नाला आले होते. तरूण आणि तरूणीच्या सहमतीने हे लग्न पार पडलं होतं. येथील ग्रामीण भागात ही प्रथा जजदा नावाने ओळखली जाते.

काय असते ही परंपरा?

हिमाचलसोबतच ही प्रथा उत्तराखंडच्या काही भागांमध्येही बघायला मिळते. असं सांगण्यात येतं की, शेती आणि वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी रोखण्यासाठी अशाप्रकारची लग्ने प्रचलित झालीत. असं मानलं जातं की, अशा लग्नाने परिवार एकत्र राहतो आणि जमिनीची वाटणी होत नाही. त्याशिवाय सुरक्षा आणि कृषी कामे सुद्धा याचं एक कारण सांगितलं जातं. कुटुंबातील सगळेच सदस्य मुलांची जबाबदारी घेतात. तर परंपरेनुसार घरातील सगळ्यात मोठा भाऊ मुलांचा कायदेशीर पिता मानला जातो.

भारतीय कायद्यात बहुपती प्रथेचा कायदेशीर मान्यता नाही. पण हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये राजस्व रेकॉर्डमध्ये अशाप्रकारच्या लग्नांचा उल्लेख आढळतो. गावातील वृद्धांनुसार, अशी लग्ने समाजाच्या सहमतीने होतात. पण यांची संख्या फारच कमी आहे. अशी लग्ने जास्त समोर येत नाहीत. 

कसा चालतो संसार?

लग्नानंतरची ही परंपरा अतिशय वेगळी आणि आश्चर्यकारक मानली जाते. एका कुटुंबात पाच भाऊ असतात आणि त्या सर्वांचा विवाह एका महिलेशी झालेला असतो. ही पद्धत काही दुर्गम आणि थंड प्रदेशांमध्ये आढळते, जिथे एकाच पत्नीशी अनेक भावांचा विवाह केला जातो. या परंपरेत एक खास नियम पाळला जातो. जर एखादा भाऊ आपल्या पत्नीसोबत असेल, तर तो खोलीच्या दरवाज्याबाहेर आपली टोपी ठेवतो. ही टोपी एक संकेत असतो. जोपर्यंत टोपी दरवाज्याजवळ ठेवलेली असते, तोपर्यंत इतर कोणताही भाऊ त्या खोलीत जात नाही. यामुळे भावांमध्ये शिस्त आणि परस्पर सन्मान राखला जातो. या समाजात महिलांना विशेष स्थान असतं. घरातील सर्व निर्णयांमध्ये महिलाच प्रमुख भूमिका बजावतात आणि त्या घराच्या प्रमुख मानल्या जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian village where brothers marry one woman: Tradition explained.

Web Summary : In parts of India, notably Himachal Pradesh and Uttarakhand, brothers share a wife to preserve family unity and land. This practice, though rare, aims to prevent property division and ensure collective responsibility for children. A unique hat system maintains harmony among the brothers.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सmarriageलग्नJara hatkeजरा हटके