शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:03 IST

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे.

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह आहे. पण भारतात असंही एक गाव आहे जिथे गेल्या २०० वर्षांपासून दिवाळी साजरीच केली जात नाही. यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

हे गाव आंध्र प्रदेशातील पोन्नान पालेम गाव आहे. गाववाले सांगतात की, २०० वर्षांपूर्वी गावात एका मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता.  इतकेच नाही तर नाग पूजेच्या दिवशी दोन बैलांचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांमध्ये यामुळे असा समज पसरला की, दिवाळी साजरी केल्यामुळेच या घटना घडल्या. मग काय तेव्हापासून या गावात दिवाळी साजरी करण्यावर बंदी आहे. 

आणखी महत्त्वाची गोष्टी या गावातून लग्न होऊन ज्या महिला दुसऱ्या गावात गेल्या आहेत. केवळ त्यांनाच दिवाळी साजरी करण्याची मुभा आहे. पण या गावात लग्न होऊन आलेल्या महिलांना दिवाळी साजरी करण्यास बंदी आहे. 

गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने सांगितले की, 'मी १२ वर्षांची असेपर्यंत दिवाळी साजरी करत होते. पण मग नंतर मी होऊन या गावात आले आणि तेव्हापासून मी दिवाळी साजरी केली नाही'. पण तब्बल २०० वर्षांपासून हा नियम पाळला जाणे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण आजकालचे तरुण हे आपल्या मनाने जगणे पसंत करतात. 

गावातील एका व्यक्तीने सांगितले की, '१२ वर्षांपूर्वी मी गावातील ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या परिवारासोबतच दुसऱ्या परिवारांनाही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित केले होते. पण उत्सव साजरा केल्यानंतर काही वर्षांनी माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हाही गावातील लोकांनी दिवाळी साजरी केल्याने असे झाल्याचे मानले'. 

टॅग्स :DiwaliदिवाळीJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश