शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:03 IST

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे.

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह आहे. पण भारतात असंही एक गाव आहे जिथे गेल्या २०० वर्षांपासून दिवाळी साजरीच केली जात नाही. यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

हे गाव आंध्र प्रदेशातील पोन्नान पालेम गाव आहे. गाववाले सांगतात की, २०० वर्षांपूर्वी गावात एका मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता.  इतकेच नाही तर नाग पूजेच्या दिवशी दोन बैलांचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांमध्ये यामुळे असा समज पसरला की, दिवाळी साजरी केल्यामुळेच या घटना घडल्या. मग काय तेव्हापासून या गावात दिवाळी साजरी करण्यावर बंदी आहे. 

आणखी महत्त्वाची गोष्टी या गावातून लग्न होऊन ज्या महिला दुसऱ्या गावात गेल्या आहेत. केवळ त्यांनाच दिवाळी साजरी करण्याची मुभा आहे. पण या गावात लग्न होऊन आलेल्या महिलांना दिवाळी साजरी करण्यास बंदी आहे. 

गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने सांगितले की, 'मी १२ वर्षांची असेपर्यंत दिवाळी साजरी करत होते. पण मग नंतर मी होऊन या गावात आले आणि तेव्हापासून मी दिवाळी साजरी केली नाही'. पण तब्बल २०० वर्षांपासून हा नियम पाळला जाणे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण आजकालचे तरुण हे आपल्या मनाने जगणे पसंत करतात. 

गावातील एका व्यक्तीने सांगितले की, '१२ वर्षांपूर्वी मी गावातील ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या परिवारासोबतच दुसऱ्या परिवारांनाही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित केले होते. पण उत्सव साजरा केल्यानंतर काही वर्षांनी माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हाही गावातील लोकांनी दिवाळी साजरी केल्याने असे झाल्याचे मानले'. 

टॅग्स :DiwaliदिवाळीJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश