शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या आंदोलन केले सुरू
4
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
5
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
6
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
7
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
8
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
9
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
10
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
11
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
12
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
13
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
14
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
15
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
16
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
17
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
18
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
19
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
20
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला

या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:03 IST

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे.

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह आहे. पण भारतात असंही एक गाव आहे जिथे गेल्या २०० वर्षांपासून दिवाळी साजरीच केली जात नाही. यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

हे गाव आंध्र प्रदेशातील पोन्नान पालेम गाव आहे. गाववाले सांगतात की, २०० वर्षांपूर्वी गावात एका मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला होता.  इतकेच नाही तर नाग पूजेच्या दिवशी दोन बैलांचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांमध्ये यामुळे असा समज पसरला की, दिवाळी साजरी केल्यामुळेच या घटना घडल्या. मग काय तेव्हापासून या गावात दिवाळी साजरी करण्यावर बंदी आहे. 

आणखी महत्त्वाची गोष्टी या गावातून लग्न होऊन ज्या महिला दुसऱ्या गावात गेल्या आहेत. केवळ त्यांनाच दिवाळी साजरी करण्याची मुभा आहे. पण या गावात लग्न होऊन आलेल्या महिलांना दिवाळी साजरी करण्यास बंदी आहे. 

गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने सांगितले की, 'मी १२ वर्षांची असेपर्यंत दिवाळी साजरी करत होते. पण मग नंतर मी होऊन या गावात आले आणि तेव्हापासून मी दिवाळी साजरी केली नाही'. पण तब्बल २०० वर्षांपासून हा नियम पाळला जाणे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण आजकालचे तरुण हे आपल्या मनाने जगणे पसंत करतात. 

गावातील एका व्यक्तीने सांगितले की, '१२ वर्षांपूर्वी मी गावातील ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या परिवारासोबतच दुसऱ्या परिवारांनाही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित केले होते. पण उत्सव साजरा केल्यानंतर काही वर्षांनी माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हाही गावातील लोकांनी दिवाळी साजरी केल्याने असे झाल्याचे मानले'. 

टॅग्स :DiwaliदिवाळीJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश