शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

बोंबला! वरातीत सोबत नेलं नाही म्हणून मित्राने नवरदेवाला पाठवली 50 लाख रूपयांची नोटीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:19 IST

Uttarakhand : रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली. 

Uttarakhand : पत्रिका देऊन लग्नात बोलवल्यानंतरही वरातीत घेऊन न गेल्याने एका मित्राने नवरदेव मित्राला 50 लाख रूपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ऐकायला हे जरा विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वारची आहे. रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली. 

चंद्रशेखर नवरदेव मित्र रविसोबत फोनवरून बोलला, तर आपली चूक मान्य करण्याऐवजी सांगितलं की, वरात घेऊन जात आहे. आता तू परत जा. यावेळी तिथे उपस्थित वरातींनी लग्नाचे कार्ड वाटणारा मित्र चंद्रशेखरला खूप काही ऐकवलं. ही बाब चंद्रशेखरच्या मनावर लागली आणि त्याला मानसिक त्रासही झाला.

यावर चंद्रशेखरने आपला वकिल अरूण भदौरियाला संपर्क केला आणि सल्ला घेत अधिवक्त्याच्या माध्यमातून नवरदेव मित्र रविला नोटीस पाठवून 3 दिवसांच्या माफी मागणे आणि नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याची मागणी केली. असं केलं नाही तर कोर्टात केस दाखल करण्याचा इशाराही दिला.

वकिल अरूण कुमार भदौरिया यांनी सांगितलं की, 23 जूनला हरिद्वारला राहणारे रवि यांचं लग्न बिजनौरच्या अंजूसोबत होतं. नवरदेव रविने मित्र चंद्रशेखरला एक लिस्ट बनवून दिली. त्यातील लोकांना पत्रिका देण्याचं आणि त्यांना लग्नाला बोलवण्याचं काम चंद्रशेखरकडे सोपवलं. 

रविच्या सांगण्यावरून चंद्रशेखरने मोना, काका, कन्हैया, छोटू, आकाश इत्यादी सर्वांना लग्नाची पत्रिका दिली आणि आग्रह केला की, 23 जूनला सायंकाळी 5 वाजता लग्नाला जाण्यासाठी तयार रहा. त्यासाठी गाडी तयार आहे. हे सगळे लोक चंद्रशेखरसोबत सायंकाळी 4.50 वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.

पण तिथे जाऊन समजलं की, वरात तर पुढे गेली. ज्यामुळे चंद्रशेखरने रविला फोन केला तर तो म्हणाला की, आम्ही लोक निघालो आणि आता तुम्ही घरी परत जा. चंद्रशेखर म्हणाला की, त्याच्या सांगण्यावरून जे लोक लग्नाला जाण्यासाठी आले होते, त्या सर्वांना फार वाईट वाटलं आणि त्या सर्वांनी चंद्रशेखरला मानसिक त्रास दिला. 

यानंतर चंद्रशेखरने आपले वकील अरूण भदौरिया यांच्या माध्यमातून एका कायदेशीर नोटीस रविला पाठवली. ज्यात तीन दिवसात सार्वजनिकपणे माफी मागण्याची आणि 50 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडmarriageलग्नCourtन्यायालयJara hatkeजरा हटके