शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 13:23 IST

निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला  'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं.

नवी दिल्ली – भारताची भौगोलिक रचना पाहिली तर अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आपण नेहमी देशाच्या भूगोलाबाबत पुस्तकांमध्ये आणि शाळांमध्ये वाचलं असेल. कोणत्या राज्याची सीमा एकमेकांना जोडल्या आहेत. कोणती नदी कुठल्या राज्यातून वाहते हे सगळे वाचायला मिळते. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा जिल्ह्याबाबत सांगणार आहोत जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात. हा देशातील एकमेव जिल्हा आहे ज्याचं नाव पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ ठेवलं होतं' तुम्हालाही या जिल्ह्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल तर चला माहिती करून घेऊ.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा, ज्याला ४ राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड यांचा समावेश आहे. या ४ राज्यांच्या सीमा सोनभद्र जिल्ह्याला जोडलेल्या आहेत. विंध्य आणि कैमूर टेकड्यांमध्ये वसलेला हा जिल्हा खनिजांनी वेढलेला आहे. क्षेत्रफळाबद्दल बोलायचं झालं तर खीरी नंतर हा उत्तर प्रदेशातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा मानला जातो.

सोनभद्र जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखाच्या आसपास आहे. सोनभद्र हे नाव सोन नदीमुळे पडले. सोन नदीच्या किनारी वसलेला हा जिल्हा आहे. सोन नदीशिवाय रिहिंद, कनहर, पांगन इत्यादी नद्याही सोनभद्र जिल्ह्यातून जातात. सोनभद्र जिल्ह्याची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली होती. मिर्झापूर जिल्ह्यातून काही गावे वगळून सोनभद्र हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. औद्योगिक क्रांतीसाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने खनिज पदार्थ, वीज उद्योगाशी निगडीत अनेक कामे पाहायला मिळतात.

पंतप्रधान नेहरूंनी म्हटलं होतं, 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया

सोनभद्र हे विंध्य आणि कैमूर पर्वतरांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला  'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं. पंडित नेहरू १९५४ मध्ये एका सिमेंट कारखान्याच्या उद्घाटनासाठी सोनभद्रला आले होते, त्यावेळी ते सोनभद्रचं सौंदर्य पाहून खूप प्रभावित झाले. सोनभद्रला एनर्जी कॅपिटल ऑफ इंडियाही म्हटलं जाते, कारण येथे सर्वाधिक पॉवर प्लांट प्रकल्प आहेत.