शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आश्चर्य! 'या' गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख आहे 1 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:39 IST

हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

ठळक मुद्दे हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख जन्मतारीख १ जानेवारी असू प्रत्येक व्यक्तीच्या आधारकार्डावर 1 जानेवारी ही जन्मतारीख आहे. 

देरहराडून- हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख जन्मतारीख १ जानेवारी असून प्रत्येकाच्या आधारकार्डावर 1 जानेवारी ही जन्मतारीख आहे. 

आधार कार्डावर असलेल्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खानची जन्मतारीख १ जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचाही जन्म १ तारखेचाच आहे. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म १ जानेवारी आहे. ही परिस्थिती फक्त एकाच कुटुंबाची आहे. इतर कुटुंबामध्येही सारखंच चित्र पाहायला मिळतं आहे. पण या गावातील ८०० कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या जन्म आधार कार्डावरील नोंदीनुसार १ जानेवारीलाच झालेला आहे. ग्रामस्थांनी आधार्ड कार्ड तयार करताना आपली ओळखपत्रं आणि मतदान ओळखपत्र सादर केले होते. तरीही आधार्ड कार्ड नोंदणी करणाऱ्या एजन्सीनं हा गोंधळ केल्याची चर्चा आहे.

आम्हाला विशेष ओळखपत्र क्रमांक दिला जाईल, असं सांगितलं होतं. पण यात विशेष काय आहे? सगळ्यांची जन्मतारीख एकच छापली आहे, असं अलफदीन यांनी म्हंटलं आहे.

जन्मतारीखेशिवाय जन्मवर्षही मतदान आणि रेशन कार्डावरील तारखेपेक्षा वेगळी छापून आली आहे. तेथील काही वृद्धांचं वय 22 वर्ष तर काही मुलांचं वय 15 ते 60 वर्षांपर्यंत छापून आलं आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. ग्रामस्थांनी रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्रांच्या कॉपी एजन्सीकडे दिल्या होत्या. ही चूक संबंधित एजन्सीची आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आधार कार्ड तयार करण्यासाठी माहिती जमा केली होती. या गोंधळामुळे आता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उपसरपंच मोहम्मद इम्रान यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 

आधार कार्डातील गोंधळाचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधी ऑगस्टमध्ये आग्रा जिल्ह्यातील तीन गावे आणि अलाहाबादमधील एका गावातही सर्व ग्रामस्थांची जन्मतारीख १ जानेवारी छापण्यात आली होती.

दरम्यान, युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कुठलीही चूक झाली नसल्याचं म्हंटलं आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड