शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

८९ वर्षांपासून आजही रहस्य बनून आहे 'हे' गाव, रातोरात अचानक गायब झाले होते लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:36 IST

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना?

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना? पण कॅनडामधील एक गाव याच गोष्टीसाठी गेल्या ८९ वर्षांपासून रहस्य बनलेलं आहे. त्यावेळी इथे अंजिकुनी तलावाच्या किनाऱ्यावर एक गाव होतं. पण हे गाव आणि त्यातील लोक अचानक गायब झाल्याचं बोललं जातं. आजपर्यंत हे रहस्य कायम आहे की, या गावातील लोक अचानक गेले कुठे?

(Image Credit : unsolvedmysteries.fandom.com)

या गावातील लोक गायब होण्यावरून एक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, १९३० मध्ये 'जो लाबेल' नावाची एक व्यक्ती भटकत भटकत या गावात पोहोचली होती. त्यावेळी हिवाळा होता, त्यामुळे तो गरम ठिकाणाच्या शोधात या ठिकाणी पोहोचला होता. तो याआधीही या गावात आला होता आणि त्यामुळे त्याला माहीत होतं की, इथे काहीना काही व्यवस्था होईल. 

(Image Credit : mysteriousfacts.com)

जेव्हा ही व्यक्ती गावात पोहोचली तेव्हा मदतीसाठी त्याने लोकांना आवाज दिला. पण त्याला त्याच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज ऐकायला आला नाही. चारही बाजूने केवळ भयान शांतता होती. त्याला तिथे ना कुणी मनुष्य दिसला ना प्राणी.

(Image Credit : Social Media)

लाबेलने चारही बाजूने नजर फिरवली तेव्हा त्याला कुणीच दिसलं नाही. त्याने विचार केला की, येथील लोक दुसऱ्या ठिकाणी गेले असतील. तो थंडीपासून वाचण्यासाठी एका घरात घुसला. घरात गेल्यावर त्याने पाहिलं की, घरातील सगळं साहित्य व्यवस्थित होतं. किचनमध्ये अर्ध शिजलेलं अन्न पडून होतं आणि चुलही पेटत होती. असं वाटत होतं की, आत्ताच कुणातरी जेवण तयार केलं.

(Image Credit : allthatsinteresting.com)

लाबेल फार घाबरलेला होता. तो लगेच त्या घरातून बाहेर पडला आणि दुसऱ्या घरात गेला. तिथेही त्याला तेच चित्र दिसलं. आता तो अधिक घाबरला होता. त्यामुळे तो तिथून पळाला.

(Image Credit : mysteriousfacts.com)

गावातील सर्वच घरांची स्थिती एकसारखी होती. असं वाटत होतं की, लोक त्यांचं काम अर्धवट सोडून कुठे गायब झालेत. लाबेलने गावाबाहेर येऊन या रहस्यमय घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर चौकशी सुरू झाली. पण पोलिसांनाही याची काहीच माहिती मिळाली नाही की, गावातील लोक नेमके अचानक गायब कुठे झालेत.

(Image Credit : allthatsinteresting.com) (सांकेतिक छायाचित्र)

पोलिसांनी आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांची विचारपूस केली. त्यातील काही लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिथे एक अजब चमकदार प्रकाश पडला होता. हा प्रकाश सतत आकार बदलत होता आणि लागोपाठ अंजिकुनी गावाकडे सरकत होता. पण याची काहीही अधिकृत माहिती नाही. पण आजही हे रहस्य कायम आहे की, या गावातील सगळे लोक अचानक गायब कुठे झालेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास