शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

८९ वर्षांपासून आजही रहस्य बनून आहे 'हे' गाव, रातोरात अचानक गायब झाले होते लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:36 IST

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना?

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना? पण कॅनडामधील एक गाव याच गोष्टीसाठी गेल्या ८९ वर्षांपासून रहस्य बनलेलं आहे. त्यावेळी इथे अंजिकुनी तलावाच्या किनाऱ्यावर एक गाव होतं. पण हे गाव आणि त्यातील लोक अचानक गायब झाल्याचं बोललं जातं. आजपर्यंत हे रहस्य कायम आहे की, या गावातील लोक अचानक गेले कुठे?

(Image Credit : unsolvedmysteries.fandom.com)

या गावातील लोक गायब होण्यावरून एक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, १९३० मध्ये 'जो लाबेल' नावाची एक व्यक्ती भटकत भटकत या गावात पोहोचली होती. त्यावेळी हिवाळा होता, त्यामुळे तो गरम ठिकाणाच्या शोधात या ठिकाणी पोहोचला होता. तो याआधीही या गावात आला होता आणि त्यामुळे त्याला माहीत होतं की, इथे काहीना काही व्यवस्था होईल. 

(Image Credit : mysteriousfacts.com)

जेव्हा ही व्यक्ती गावात पोहोचली तेव्हा मदतीसाठी त्याने लोकांना आवाज दिला. पण त्याला त्याच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज ऐकायला आला नाही. चारही बाजूने केवळ भयान शांतता होती. त्याला तिथे ना कुणी मनुष्य दिसला ना प्राणी.

(Image Credit : Social Media)

लाबेलने चारही बाजूने नजर फिरवली तेव्हा त्याला कुणीच दिसलं नाही. त्याने विचार केला की, येथील लोक दुसऱ्या ठिकाणी गेले असतील. तो थंडीपासून वाचण्यासाठी एका घरात घुसला. घरात गेल्यावर त्याने पाहिलं की, घरातील सगळं साहित्य व्यवस्थित होतं. किचनमध्ये अर्ध शिजलेलं अन्न पडून होतं आणि चुलही पेटत होती. असं वाटत होतं की, आत्ताच कुणातरी जेवण तयार केलं.

(Image Credit : allthatsinteresting.com)

लाबेल फार घाबरलेला होता. तो लगेच त्या घरातून बाहेर पडला आणि दुसऱ्या घरात गेला. तिथेही त्याला तेच चित्र दिसलं. आता तो अधिक घाबरला होता. त्यामुळे तो तिथून पळाला.

(Image Credit : mysteriousfacts.com)

गावातील सर्वच घरांची स्थिती एकसारखी होती. असं वाटत होतं की, लोक त्यांचं काम अर्धवट सोडून कुठे गायब झालेत. लाबेलने गावाबाहेर येऊन या रहस्यमय घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर चौकशी सुरू झाली. पण पोलिसांनाही याची काहीच माहिती मिळाली नाही की, गावातील लोक नेमके अचानक गायब कुठे झालेत.

(Image Credit : allthatsinteresting.com) (सांकेतिक छायाचित्र)

पोलिसांनी आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांची विचारपूस केली. त्यातील काही लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिथे एक अजब चमकदार प्रकाश पडला होता. हा प्रकाश सतत आकार बदलत होता आणि लागोपाठ अंजिकुनी गावाकडे सरकत होता. पण याची काहीही अधिकृत माहिती नाही. पण आजही हे रहस्य कायम आहे की, या गावातील सगळे लोक अचानक गायब कुठे झालेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास