शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

८९ वर्षांपासून आजही रहस्य बनून आहे 'हे' गाव, रातोरात अचानक गायब झाले होते लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:36 IST

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना?

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे राहणारे लोक अचानक गायब झालेत. नाही ना? पण कॅनडामधील एक गाव याच गोष्टीसाठी गेल्या ८९ वर्षांपासून रहस्य बनलेलं आहे. त्यावेळी इथे अंजिकुनी तलावाच्या किनाऱ्यावर एक गाव होतं. पण हे गाव आणि त्यातील लोक अचानक गायब झाल्याचं बोललं जातं. आजपर्यंत हे रहस्य कायम आहे की, या गावातील लोक अचानक गेले कुठे?

(Image Credit : unsolvedmysteries.fandom.com)

या गावातील लोक गायब होण्यावरून एक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, १९३० मध्ये 'जो लाबेल' नावाची एक व्यक्ती भटकत भटकत या गावात पोहोचली होती. त्यावेळी हिवाळा होता, त्यामुळे तो गरम ठिकाणाच्या शोधात या ठिकाणी पोहोचला होता. तो याआधीही या गावात आला होता आणि त्यामुळे त्याला माहीत होतं की, इथे काहीना काही व्यवस्था होईल. 

(Image Credit : mysteriousfacts.com)

जेव्हा ही व्यक्ती गावात पोहोचली तेव्हा मदतीसाठी त्याने लोकांना आवाज दिला. पण त्याला त्याच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कुणाचाही आवाज ऐकायला आला नाही. चारही बाजूने केवळ भयान शांतता होती. त्याला तिथे ना कुणी मनुष्य दिसला ना प्राणी.

(Image Credit : Social Media)

लाबेलने चारही बाजूने नजर फिरवली तेव्हा त्याला कुणीच दिसलं नाही. त्याने विचार केला की, येथील लोक दुसऱ्या ठिकाणी गेले असतील. तो थंडीपासून वाचण्यासाठी एका घरात घुसला. घरात गेल्यावर त्याने पाहिलं की, घरातील सगळं साहित्य व्यवस्थित होतं. किचनमध्ये अर्ध शिजलेलं अन्न पडून होतं आणि चुलही पेटत होती. असं वाटत होतं की, आत्ताच कुणातरी जेवण तयार केलं.

(Image Credit : allthatsinteresting.com)

लाबेल फार घाबरलेला होता. तो लगेच त्या घरातून बाहेर पडला आणि दुसऱ्या घरात गेला. तिथेही त्याला तेच चित्र दिसलं. आता तो अधिक घाबरला होता. त्यामुळे तो तिथून पळाला.

(Image Credit : mysteriousfacts.com)

गावातील सर्वच घरांची स्थिती एकसारखी होती. असं वाटत होतं की, लोक त्यांचं काम अर्धवट सोडून कुठे गायब झालेत. लाबेलने गावाबाहेर येऊन या रहस्यमय घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर चौकशी सुरू झाली. पण पोलिसांनाही याची काहीच माहिती मिळाली नाही की, गावातील लोक नेमके अचानक गायब कुठे झालेत.

(Image Credit : allthatsinteresting.com) (सांकेतिक छायाचित्र)

पोलिसांनी आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांची विचारपूस केली. त्यातील काही लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिथे एक अजब चमकदार प्रकाश पडला होता. हा प्रकाश सतत आकार बदलत होता आणि लागोपाठ अंजिकुनी गावाकडे सरकत होता. पण याची काहीही अधिकृत माहिती नाही. पण आजही हे रहस्य कायम आहे की, या गावातील सगळे लोक अचानक गायब कुठे झालेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास