शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहे भारतातील अखेरचं स्टेशन...इथं उतरून तुम्ही पायी चालत परदेशात जाऊ शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:41 IST

या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. मैत्री एक्सप्रेस नावाच्या दोन पॅसेंजर गाड्या येथून जातात.

नवी दिल्ली - परदेशात फिरण्याचं आवड भले कुणाला नसते? हा विचार आला तर विमान प्रवासाचा विचार पहिला मनात येतो. पण तुम्हाला माहित आहे का की देशात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथून पायी चालत परदेशात जाता येते. शेजारील देशांना लागून असलेल्या सीमाभागातून हे शक्य आहे. तिन्ही बाजूंनी भारतीय सीमांनी वेढलेल्या नेपाळचे उदाहरण घ्या. जोगबानी हे बिहारमधील अररिया जिल्ह्यातील ठिकाण आहे. हे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे, जिथे उतरून नेपाळला पायी जाता येते. असेच एक शेवटचे स्टेशन सिंघाबाद आहे, जे पश्चिम बंगालमध्ये येते.

भारतातील शेवटच्या रेल्वे स्टेशनचे नाव सिंघाबाद आहे. हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. या स्थानकात विशेष काही नसले तरी बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले हे भारताचे अखेरचे बॉर्डर स्टेशन आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळातील हे स्टेशन आहे आणि जसे इंग्रजांनी हे स्टेशन सोडले होते तसे आजही चित्र फारसे बदललेले नाही. ते बांगलादेशच्या सीमेला लागून वसलेले आहे. सिंघाबाद बांगलादेशच्या इतके जवळ आहे की लोक काही किलोमीटर चालत बांगलादेशात जातात. या छोट्या रेल्वे स्टेशनवर फारसे लोक दिसत नाहीत. या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. मैत्री एक्सप्रेस नावाच्या दोन पॅसेंजर गाड्या येथून जातात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली, त्यानंतर या स्थानकाचे काम थांबले आणि हे स्थानक ओसाड पडले. १९७८ मध्ये जेव्हा या मार्गावर मालगाड्या सुरू झाल्या, तेव्हा पुन्हा शिट्ट्यांचे आवाज येऊ लागले. पूर्वी ही रेल्वे भारतातून बांगलादेशात येत जात असत. नोव्हेंबर २०११ मध्ये जुन्या करारात दुरुस्ती केल्यानंतर शेजारील देश नेपाळचाही त्यात समावेश करण्यात आला. या स्थानकात सिग्नल, दळणवळण आणि स्टेशनशी संबंधित उपकरणे आजतागायत बदलण्यात आलेली नाहीत, उलट सर्व काही जुन्याच धर्तीवर सुरू आहे. येथे अजूनही सिग्नलसाठी हँड गिअर्स वापरतात. रेल्वे कर्मचारीही येथे केवळ नावालाच आहेत. येथील तिकीट काउंटर बंद करण्यात आले आहे. फक्त मालगाड्या सिग्नलची वाट बघतात, ज्यांना रोहनपूरमार्गे बांगलादेशला जायचे असते.  

टॅग्स :railwayरेल्वेBangladeshबांगलादेश