शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मृत्यूबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा, वाचा नेमकं शेवटच्या क्षणाला काय वाटतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:49 IST

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा.

(Image Credit : theconversation.com)

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा. पण अशात मृत्यूबाबत एक आश्चर्यजनक बाब रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चनुसार, मृत्यू एक आनंद देणारा क्षण आहे आणि त्यावेळी व्यक्तीला इतका आनंद मिळतो की, त्याला पुन्हा जीवनाकडे परतण्याची इच्छा तो सोडून देतो.

काही रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, जगात असेही काही लोक आहेत ज्यांना मृत्यूच्या दारातून पुन्हा जगण्याची संधी मिळाली. जीवन संपण्याचा क्षण आणि पुन्हा जगण्याचा जुडण्याची जाणीव लोकांसाठी इतकी आनंददायी असते की, ती भावना व्यक्त करण्याच्या स्थितीत व्यक्ती नसते.

(Image Credit : scientificamerican.com)

Plos One नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, Artificial Intelligenceचा वापर करत १५८ अशा घटनांचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. या अशा लोकांकडून लिहिलेल्या घटना होत्या, ज्यांनी मृत्यूचा क्षणभरासाठी अनुभव केला होता.

(Image Credit : independent.co.uk)

या लोकांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये 'बघणे' आणि 'प्रकाश' अशा शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा करण्यात आला होता. आणि भिती व मृत अशा शब्दांचा वापर फार कमी करण्यात आला होता. कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि बेल्जिअमच्या युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनुसार, त्यांच्या निष्कर्षातून असे पुरावे मिळाले आहेत ज्यात मृत्यूच्या फार जवळ पोहोचलेल्या लोकांनी सांगितले की, त्यावेळी त्यांची भावना तशी नव्हती जशी जगताना असते.

रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॅनेडिअन पॅरामेडिकल टीमचे एक सदस्य एडम टीप यांना जेव्हा विजेचा झटका बसला होता तेव्हा ते ११ मिनिटांसाठी मृत झाले होते. पण जेव्हा ते पुन्हा जिंवत झाले तेव्हा त्यांनी त्या क्षणाबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की, तो अनुभव असा होता की, जणू मी एखाद्या ओळखीच्या जागेवर गाढ झोपेतून जागा झालोय आणि मला कशाचीही भिती वाटत नव्हती. मनात शांतताच शांतता होती आणि आनंदाची भावना होती.

या रिसर्चमध्ये अशा घटनांमधून गेलेल्या लोकांना असे प्रश्न विचारण्यात आले होते की, तुम्हाला त्यावेळी आनंद किंवा शांतता वाटत होती का? आणि तुम्हाला शरीरातून मुक्त झाल्याचं काही जाणवलं का? त्यावेळी मनात काय भावना होती? 

 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेDeathमृत्यूResearchसंशोधन