शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मृत्यूबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा, वाचा नेमकं शेवटच्या क्षणाला काय वाटतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:49 IST

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा.

(Image Credit : theconversation.com)

कोणतीही व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर ती गोष्ट आहे मृत्यू. सगळेच हा प्रयत्न करत असतात की, त्यांना जास्त आयुष्य जगता यावं आणि मृत्यू त्याच्यापासून दूर रहावा. पण अशात मृत्यूबाबत एक आश्चर्यजनक बाब रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चनुसार, मृत्यू एक आनंद देणारा क्षण आहे आणि त्यावेळी व्यक्तीला इतका आनंद मिळतो की, त्याला पुन्हा जीवनाकडे परतण्याची इच्छा तो सोडून देतो.

काही रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, जगात असेही काही लोक आहेत ज्यांना मृत्यूच्या दारातून पुन्हा जगण्याची संधी मिळाली. जीवन संपण्याचा क्षण आणि पुन्हा जगण्याचा जुडण्याची जाणीव लोकांसाठी इतकी आनंददायी असते की, ती भावना व्यक्त करण्याच्या स्थितीत व्यक्ती नसते.

(Image Credit : scientificamerican.com)

Plos One नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, Artificial Intelligenceचा वापर करत १५८ अशा घटनांचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. या अशा लोकांकडून लिहिलेल्या घटना होत्या, ज्यांनी मृत्यूचा क्षणभरासाठी अनुभव केला होता.

(Image Credit : independent.co.uk)

या लोकांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये 'बघणे' आणि 'प्रकाश' अशा शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा करण्यात आला होता. आणि भिती व मृत अशा शब्दांचा वापर फार कमी करण्यात आला होता. कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि बेल्जिअमच्या युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनुसार, त्यांच्या निष्कर्षातून असे पुरावे मिळाले आहेत ज्यात मृत्यूच्या फार जवळ पोहोचलेल्या लोकांनी सांगितले की, त्यावेळी त्यांची भावना तशी नव्हती जशी जगताना असते.

रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॅनेडिअन पॅरामेडिकल टीमचे एक सदस्य एडम टीप यांना जेव्हा विजेचा झटका बसला होता तेव्हा ते ११ मिनिटांसाठी मृत झाले होते. पण जेव्हा ते पुन्हा जिंवत झाले तेव्हा त्यांनी त्या क्षणाबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले होते की, तो अनुभव असा होता की, जणू मी एखाद्या ओळखीच्या जागेवर गाढ झोपेतून जागा झालोय आणि मला कशाचीही भिती वाटत नव्हती. मनात शांतताच शांतता होती आणि आनंदाची भावना होती.

या रिसर्चमध्ये अशा घटनांमधून गेलेल्या लोकांना असे प्रश्न विचारण्यात आले होते की, तुम्हाला त्यावेळी आनंद किंवा शांतता वाटत होती का? आणि तुम्हाला शरीरातून मुक्त झाल्याचं काही जाणवलं का? त्यावेळी मनात काय भावना होती? 

 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेDeathमृत्यूResearchसंशोधन