शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

लग्नाआधी प्रत्येक मुलीने जोडीदाराला विचारलाच पाहिजे 'हा' एक प्रश्न; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:59 IST

कोणत्या उत्तरानंतर मुलाला लग्नाला होकार द्यावा याबद्दल त्यांनी सांगितलं आहे

Vikas Divyakirti, Advice before Marriage : लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. एखाद्याशी आयुष्यभराचे बंध जुळवण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला नीट जाणून घेणे महत्त्वाचे असते. अर्धवट माहिती असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केल्यास काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. मोटिवेशनल स्पीकर विकास दिव्यकिर्ती हे तरूणाईमधील एक लोकप्रिय असे नाव आहे. डॉ. विकास दिव्यकीर्ती हे दृष्टी IAS चे संस्थापक आणि 1996 च्या बॅचचे IAS आहेत. ते इंटरनेटवर तरुणांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मते, मुलींनी लग्न करण्यापूर्वी मुलांना एक विशेष प्रश्न विचारला पाहिजे. जाणून घेऊया त्याबाबत...

लग्नाआधी मुलीने मुलाला हा एक प्रश्न नक्की विचारावा-

डॉ. विकास दिव्यकीर्ती मुलींना सल्ला देतात की, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला लग्नासाठी प्रश्न विचाराल तेव्हा त्यात एक प्रश्न नक्की विचारा. तो प्रश्न म्हणजे, तुम्ही शेवटचे कधी रडला होतात?

'हे' उत्तर असेल तरच लग्न करा

दिव्यकिर्तींच्या मते, जर मुलाचे उत्तर असे असेल की आम्ही रडत नाही किंवा लहानपणी शेवटचे रडलो, तर मग तो कोणत्याही पदावर असला तरीही त्याच्याशी लग्न करू नका. कारण जी व्यक्ती गेली अनेक वर्षे रडली नाही, ते भावनेला फारसे महत्त्व देणारे नसतात.

यामागचे 'लॉजिक' काय?

एखादी भावनिक गोष्ट घडते तेव्हा तुम्ही रडत असाल तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असले पाहिजे, कारण याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या गोष्टीची काळजी वाटते. असे झाले नाही तर अश्रू बाहेर पडत नाहीत, असेही मत त्यांनी मांडले. सहज रडणारी व्यक्ती खूप भावनिक असते. असे लोक जीवन खूप खोलवर जगतात आणि इतरांनाही सहसा दुखवत नाहीत, असे दिव्यकिर्ती यांचे मत आहे.

रडण्यासंदर्भात अभ्यासात समोर आली ही बाब

रडण्याच्या क्रियेबाबतच्या अभ्यासात असे दिसून आले की जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते तेव्हा डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन रसायने आढळतात, ज्यामुळे चांगले वाटण्यास मदत होते आणि शारीरिक आणि भावनिक वेदना कमी होतात. याचा निष्कर्ष असा आहे की रडण्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत बनतात.

टॅग्स :marriageलग्नRelationship Tipsरिलेशनशिपhusband and wifeपती- जोडीदार