शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 12:25 IST

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात.

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मनुष्य तुम्हाला सोनं बहुमूल्य दगड किंवा हिरे शोधताना दिसतात. तेच आश्चर्याची बाब म्हणजे या गोष्टी त्यांना सापडतात सुद्धा. असंच एक ठिकाण भारतातही आहे. इथे लोक खुल्या मैदानात, शेतात हिरे शोधतात. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. Geological Survey of India नुसार, पेरावली, तुग्गाली, जोन्नागिरी आणि वजराकरूर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.

दूरदूरून लोक हिरे शोधायला येतात

हिरे सापडत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांनाही आहे. ते नेहमीच इथे हिरे शोधायला येतात. ते आजूबाजूच्या राज्यातील लोकही हिऱ्याच्या शोधात इथे पोहोचतात. लोक त्यांची मजुरी सोडून इथे हिरे शोधायला येतात. त्यांना अपेक्षा असते की हिरा त्यांचं नशीब बदलेल. बीबीसीसोबत बोलताना गुंटूरमधील एक व्यक्ती म्हणाले की, त्यांच्या एका मित्राला  इथेच हिरा सापडला होता. त्यामुळे तेही त्यांचं नशीब पारखण्यासाठी इथे येतात.

कसे शोधतात हिरे ?

रिपोर्टनुसार इथे हिऱ्याच्या शोधात आलेले लोक कोणत्याही विशेष टेक्नीकचा वापर करत नाही. त्यांना जो दगड वेगळा आणि खास दिसतो तो ते उचलतात. हे लोक सूर्य किंवा चंद्र किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारावर हिरे शोधण्याच्या जागेची निवड करतात.

कुठे विकतात?

इथे सापलेले हिरे खरेदी करणारे इथे भरपूर लोक आहेत. ते लोकांकडून हिरे खरेदी करतात. पण फार जास्त किंमत देत नाहीत. नंतर तेच लोक हे हिरे  मोठ्या किंमतीत विकतात. मुळात हे एक फारच मेहनतीचं आणि पेशन्सचं काम आहे. यात नशीबाचाही मोठा खेळ आहे.

हिरे जमिनीतून वर येतात

Geological Survey of India चे उप-निर्देशक राजा बाबू म्हणाले की आंध प्रदेशातील दोन जिल्हे करनूल आणि अनंतपूरसोबत तेलंगणातील महबूबनगर हे खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यानुसार, जेव्हा जमिनीच्या खाली काही नैसर्गिक बदल होतो, तेव्हा जमिनीच्या आतील हिरे जमिनीच्या वर येतात.

काळा दगड

जीएसआयनुसार, या भागांमध्ये हिरे जमिनीच्या वर येणाचं मुख्य कारण ५ हजार वर्षात झालेलं मृदा क्षरण म्हणजे Soil Erosion हेही आहे. अधिकारी सांगतात की, पृथ्वीच्या १४०-१९० फूट खोलात असलेलं कार्बन अणु दबाव आणि जास्त तापमानामुळे हिऱ्या रूपांतरित होतं. तेच जेव्हा पृथ्वीत स्फोट होऊन लाव्हारस बाहेर येतो, हा लाव्हा नंतर काळा दगड बनतो. ज्याला किम्बरलाइट आणि लॅम्प्रोइट पाइप असंही म्हणतात.  हे पाइप हिऱ्यांसाठी स्टोर हाउससारखं काम करतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश