शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 12:25 IST

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात.

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मनुष्य तुम्हाला सोनं बहुमूल्य दगड किंवा हिरे शोधताना दिसतात. तेच आश्चर्याची बाब म्हणजे या गोष्टी त्यांना सापडतात सुद्धा. असंच एक ठिकाण भारतातही आहे. इथे लोक खुल्या मैदानात, शेतात हिरे शोधतात. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. Geological Survey of India नुसार, पेरावली, तुग्गाली, जोन्नागिरी आणि वजराकरूर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.

दूरदूरून लोक हिरे शोधायला येतात

हिरे सापडत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांनाही आहे. ते नेहमीच इथे हिरे शोधायला येतात. ते आजूबाजूच्या राज्यातील लोकही हिऱ्याच्या शोधात इथे पोहोचतात. लोक त्यांची मजुरी सोडून इथे हिरे शोधायला येतात. त्यांना अपेक्षा असते की हिरा त्यांचं नशीब बदलेल. बीबीसीसोबत बोलताना गुंटूरमधील एक व्यक्ती म्हणाले की, त्यांच्या एका मित्राला  इथेच हिरा सापडला होता. त्यामुळे तेही त्यांचं नशीब पारखण्यासाठी इथे येतात.

कसे शोधतात हिरे ?

रिपोर्टनुसार इथे हिऱ्याच्या शोधात आलेले लोक कोणत्याही विशेष टेक्नीकचा वापर करत नाही. त्यांना जो दगड वेगळा आणि खास दिसतो तो ते उचलतात. हे लोक सूर्य किंवा चंद्र किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारावर हिरे शोधण्याच्या जागेची निवड करतात.

कुठे विकतात?

इथे सापलेले हिरे खरेदी करणारे इथे भरपूर लोक आहेत. ते लोकांकडून हिरे खरेदी करतात. पण फार जास्त किंमत देत नाहीत. नंतर तेच लोक हे हिरे  मोठ्या किंमतीत विकतात. मुळात हे एक फारच मेहनतीचं आणि पेशन्सचं काम आहे. यात नशीबाचाही मोठा खेळ आहे.

हिरे जमिनीतून वर येतात

Geological Survey of India चे उप-निर्देशक राजा बाबू म्हणाले की आंध प्रदेशातील दोन जिल्हे करनूल आणि अनंतपूरसोबत तेलंगणातील महबूबनगर हे खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यानुसार, जेव्हा जमिनीच्या खाली काही नैसर्गिक बदल होतो, तेव्हा जमिनीच्या आतील हिरे जमिनीच्या वर येतात.

काळा दगड

जीएसआयनुसार, या भागांमध्ये हिरे जमिनीच्या वर येणाचं मुख्य कारण ५ हजार वर्षात झालेलं मृदा क्षरण म्हणजे Soil Erosion हेही आहे. अधिकारी सांगतात की, पृथ्वीच्या १४०-१९० फूट खोलात असलेलं कार्बन अणु दबाव आणि जास्त तापमानामुळे हिऱ्या रूपांतरित होतं. तेच जेव्हा पृथ्वीत स्फोट होऊन लाव्हारस बाहेर येतो, हा लाव्हा नंतर काळा दगड बनतो. ज्याला किम्बरलाइट आणि लॅम्प्रोइट पाइप असंही म्हणतात.  हे पाइप हिऱ्यांसाठी स्टोर हाउससारखं काम करतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश