शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 12:25 IST

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात.

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मनुष्य तुम्हाला सोनं बहुमूल्य दगड किंवा हिरे शोधताना दिसतात. तेच आश्चर्याची बाब म्हणजे या गोष्टी त्यांना सापडतात सुद्धा. असंच एक ठिकाण भारतातही आहे. इथे लोक खुल्या मैदानात, शेतात हिरे शोधतात. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. Geological Survey of India नुसार, पेरावली, तुग्गाली, जोन्नागिरी आणि वजराकरूर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.

दूरदूरून लोक हिरे शोधायला येतात

हिरे सापडत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांनाही आहे. ते नेहमीच इथे हिरे शोधायला येतात. ते आजूबाजूच्या राज्यातील लोकही हिऱ्याच्या शोधात इथे पोहोचतात. लोक त्यांची मजुरी सोडून इथे हिरे शोधायला येतात. त्यांना अपेक्षा असते की हिरा त्यांचं नशीब बदलेल. बीबीसीसोबत बोलताना गुंटूरमधील एक व्यक्ती म्हणाले की, त्यांच्या एका मित्राला  इथेच हिरा सापडला होता. त्यामुळे तेही त्यांचं नशीब पारखण्यासाठी इथे येतात.

कसे शोधतात हिरे ?

रिपोर्टनुसार इथे हिऱ्याच्या शोधात आलेले लोक कोणत्याही विशेष टेक्नीकचा वापर करत नाही. त्यांना जो दगड वेगळा आणि खास दिसतो तो ते उचलतात. हे लोक सूर्य किंवा चंद्र किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारावर हिरे शोधण्याच्या जागेची निवड करतात.

कुठे विकतात?

इथे सापलेले हिरे खरेदी करणारे इथे भरपूर लोक आहेत. ते लोकांकडून हिरे खरेदी करतात. पण फार जास्त किंमत देत नाहीत. नंतर तेच लोक हे हिरे  मोठ्या किंमतीत विकतात. मुळात हे एक फारच मेहनतीचं आणि पेशन्सचं काम आहे. यात नशीबाचाही मोठा खेळ आहे.

हिरे जमिनीतून वर येतात

Geological Survey of India चे उप-निर्देशक राजा बाबू म्हणाले की आंध प्रदेशातील दोन जिल्हे करनूल आणि अनंतपूरसोबत तेलंगणातील महबूबनगर हे खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यानुसार, जेव्हा जमिनीच्या खाली काही नैसर्गिक बदल होतो, तेव्हा जमिनीच्या आतील हिरे जमिनीच्या वर येतात.

काळा दगड

जीएसआयनुसार, या भागांमध्ये हिरे जमिनीच्या वर येणाचं मुख्य कारण ५ हजार वर्षात झालेलं मृदा क्षरण म्हणजे Soil Erosion हेही आहे. अधिकारी सांगतात की, पृथ्वीच्या १४०-१९० फूट खोलात असलेलं कार्बन अणु दबाव आणि जास्त तापमानामुळे हिऱ्या रूपांतरित होतं. तेच जेव्हा पृथ्वीत स्फोट होऊन लाव्हारस बाहेर येतो, हा लाव्हा नंतर काळा दगड बनतो. ज्याला किम्बरलाइट आणि लॅम्प्रोइट पाइप असंही म्हणतात.  हे पाइप हिऱ्यांसाठी स्टोर हाउससारखं काम करतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश