शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पार्लरला जाते सांगून लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको गायब, नंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:19 IST

राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच (First Wedding Anniversary) बायको ब्यूटी पार्लरला जात असल्याचं कारण देत पसार झाल्याची घटना समोर आली आहे. बराच वेळ होऊनही ती परतली नसल्यान नवऱ्यानं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण ती काही सापडली नाही. यानंतर तो लगेचच आग्र्याला  तिच्या माहेरी पोहोचला. मात्र, तिच्या माहेरच्या लोकांनी दरजावाही उघडला नाही. त्याची बायको आपल्या माहेरीच पळून (Wife Run Away to Maternal Place) आली होती. तब्बल ३१ तास नवरा तिच्या घराबाहेर बसून राहिला. पण त्याला तिच्याशिवायच परतावं लागलं.

राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता. अविनाश हा अकाउंटंट असून त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. मात्र, चांगली नोकरी असतानाही अविनाश हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं महिला आयोगात केली. या प्रकरणाची चौकशी अजमेर पोलिसांकडे सोपवण्यात आली. यानंतर काही दिवसातच अजमेर पोलीस अविनाशच्या घरी पोहोचले.  (हे पण वाचा : रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?)

या घटनेनंतर अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. इतकंच नाही तर त्याला आपली नोकरीही गमवावी लागली. काही महिने गेल्यावर बायको त्याच्यासोबत फोनवर बोलत होती, मात्र ती घरी परत यायला तयार होत नव्हती. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश पुन्हा एकदा गेल्या शनिवारी तिच्या माहेरी गेला. 

मात्र, अविनाश घरी येताच बायको आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. अविनाशनंही तिच्या घराच्या बाहेरच बसून राहिला. अविनाशला या अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनाही त्याची दया आली आणि त्यांनी अविनाशची झोपण्याची व्यवस्था करुन दिली. हे बरेच दिवस चाललं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अविनाशला पुन्हा मागे परतावं लागलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानWomenमहिला