शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:08 IST

काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी...

तुम्ही कधी ऐकलं असेल की, पहिलं प्रेम एकदा तुमच्यापासून दूर गेलं तर ते पुन्हा मिळत नाही. पण राजस्थानच्या एका भूताच्या गावाच्या गेटकिपरला ५० वर्षानंतर त्याचं पहिलं प्रेम परत मिळालं. ७० च्या दशकात ऑस्ट्रेलियातील एक मुलगी राजस्थानमध्ये फिरायला आली होती. ती यादरम्यान या गेटकिपरच्या प्रेमात पडली. पण काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी...

८२ वर्षीय आजोबाने सांगितली लव्हस्टोरी

'माझं वय ३० वर्षे होतं जेव्हा मी पहिल्यांदा मरीनाला भेटलो होतो. ती वाळवंटात सफारीसाठी ऑस्ट्रेलियातून जैसलमेरला आली होती. मरीना पाच दिवसांसाठी आली होती आणि मी तिला उंटाची सवारी करणं शिकवलं. १९७० साल होतं. त्या काळात पहिल्या नजरेत प्रेम होत होतं. ठीक तसंच झालं. आम्ही दोघे पहिल्या नजरेत प्रेमात पडलो.

पूर्ण ट्रिप दरम्यान आम्ही सतत सोबत राहत होतो. ती ऑस्ट्रेलियाला परत जाण्याआधी ती मला I Love You म्हणाली. ते ऐकून मी पूर्णपणे लाल झालो होतो. मी ते दिवस अजिबात विसर शकत नाही. मी लाजलो होतो. तिने प्रेम व्यक्त केल्यावर मी तिला काहीच उत्तर देऊ शकलो नाही.

पण ती समजून गेली होती आणि मरीना परत गेल्यावर आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. ती मला दर आठवड्याला पत्र लिहित होती. आणि काही आठवड्यानंतर तिने मला ऑस्ट्रेलियाला बोलवलं. मला असं वाटत होतं की, मी चंद्रावरच आलो. माझ्या परिवाराला न सांगता मी ३० हजार रूपये उधार घेतले आणि मेलबर्नसाठी तिकिट खरेदी केलं. व्हिसा मिळवला. ते तीन महिने फारच कमाल होते. तिने मला इंग्रजी शिकवलं. मी तिला घूमर करणं शिकवलं. ती म्हणाली चल लग्न करूया आणि इथेच ऑस्ट्रेलियात राहुया. हे माझ्यासाठी अवघड होतं.

मला माझी मातृभूमी सोडून जायची नव्हती आणि तिला भारतात रहायचं नव्हतं. मी तिला म्हणालो की, 'हे जास्त काळ चालू शकणार नाही'. आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे सोपं नव्हतं. ज्या दिवशी मी तिला सोडलं. ती त्या दिवशी फार रडत होती. पण माझा नाइलाज होता.

नंतर आमचं आयुष्य पुढे गेलं. काही वर्षांनी परिवाराच्या दबावामुळे मी लग्न केलं. त्यानंतर मी कुलधराचा गेटकिपर म्हणून नोकरी केली. नंतर मी विचार करायचो की, मरीनाने लग्न केलं असेल का? काय मी तिला पुन्हा बघू शकेल? पण माझी तिला पुन्हा पत्र लिहिण्याची हिंमत झाली नाही.

जसजसा काळ गेला आठवणीही धुसर होत गेल्या. मी माझ्या परिवाराच्या जबाबदारीत बिझी झालो. आणि दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचं निधन झालं. माझ्या सर्व मुलांचं लग्न झालं आणि ते त्यांचं जगत आहेत. मी ८२ वर्षाचा म्हातारा भारतातील भूताच्या गावात गेटकिपिंगची नोकरी करत राहिलो.

मी जसा विचार केला की, आता माझ्या आयुष्यात काही वेगळं घडणार नाही. तेव्हाच असं काही झालं. एक महिन्याआधी मला मरीनाचं पत्र आलं. तिने विचारले 'तू कसा आहेस माझ्या मित्रा?'. माझ्या अंगावर शहारे आले. ५० वर्षानंतरही तिने मला शोधलं. त्यानंतर ती मला रोज कॉल करते.

तिने मला सांगितले की, तिने कधीच लग्न केलं नाही आणि ती लवकरच भारतात येणार आहे. रामाची शपथ मला असं वाटत होतं की, मी पुन्हा २१ वर्षांचा झालोय. मला नाही माहीत की, भविष्य काय आहे. पण माझं पहिलं प्रेम माझ्या जीवनात परत आलंय, ते माझ्याशी रोज बोलतंय ही जाणीव मला कळत नाहीये'. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट