शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:46 IST

Jarahatke News: कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात.

भोपाळ - लहरीपणा हे भारतातील मान्सूनचं वैशिष्ट्य आहे. कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात. मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये सोयाबीनच्या पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने आता लोकांनी वरुणदेवाला राजी करण्यासाठी वेगवेगळ्या परंपरांचा आधार घेण्यासा सुरुवात केली आहे. रतलाममधील धराड गावामध्ये पावसाला राजीकरण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या प्रमुखाला ढोल ताशांच्या आवाजात गाढवावर बसवून त्याची गाढवावरून मिरवणूक काढली.

पावसासाठी वरुणदेवाला प्रसन्न करावे लागते आणि तसेच गावाच्या प्रमुखाला गाढवावरून फिरवले की चांगला पाऊस होतो, अशी येथील लोकांची भावना आहे. दरम्यान, रतलाममध्ये पावसाच्या सुरुवातीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र गेल्या १० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. तसेच त्यामुळे रुसलेल्या वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत.

रतलाममधील धराड गावातील लोकांनी एका अजब परंपरेच्या माध्यमातून वरुणदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. येथे गावचे उपसरपंच मनोज राठोड यांना गाढवावर बसवून फिरवण्यात आले. त्यावेळी ढोल,नगाऱ्यासारखी वाद्ये वाजवली गेली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवतांची पूजा केली आणि चांगला पाऊस पडावा यासाठी गाऱ्हाणे घातले.

दरम्यान, उपसपंचांची गाढवावरून काढलेली मिरवणूक स्मशानात पोहोचलीय तेथे स्थानिक रिवाजानुसार विधा पार पडले. पूर्वीच्या काळी गावात पाऊस न पडल्यास गावचे राजे गाढवावर बसून फिरून देवतांची पूजा करून पावसासाठी प्रार्थना करत असत.  त्याच आधारावर आता गावचे सरपंच आणि उपसरपंच हेच गावचे राजे आहेत. त्यामुळे अशी प्रथा पार पाडल्याने वरुणदेवर राजी होऊन चांगला पाऊस पाडतील, अशी अपेक्षा एका ग्रामस्थाने व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत