शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

भारतीय शेतकऱ्यानं तयार केली अनोखी इलेक्ट्रीक कार; एलन मस्क देखील होतील हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:33 IST

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय.

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय. ओडिशामध्ये एका शेतकऱ्यानं चक्क सौरऊर्जेवर चार्ज होणारी इलेक्ट्रीक कार तयार केलीय. (odisha farmer electric vehicle that run 300km in a single charge)

तेलाच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं सध्या इलेक्ट्रीक वाहनांचा जमाना आला आहे. अनेक वाहन निर्मात्या कंपन्या आता इलेक्ट्रीन वाहन उत्पादनाकडे वळत आहेत. पण भारतातील एक सामान्य शेतकरी कोणतंही इंजिनियरिंगचं शिक्षण न घेता इलेक्ट्रीक कार तयार करू शकतो यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. ओडिशामधील शेतकऱ्यानं तसं करुन दाखवलंय. 

ओडिशाच्या मयूरभंज येथील सुशील अग्रवाल नावाच्या शेतकऱ्यानं चारचाकी इलेक्ट्रीक वाहन तयार केलं आहे. विशेष म्हणजे ही कार सौरऊर्जेवर चार्ज होणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल ३०० किमी इतकी चालवता येते. 

लॉकडाऊनमध्ये केली कमालसुशील अग्रवाल यांच्या घरीच एक वर्कशॉप आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सगळं कामकाज ठप्प झालं होतं. अशावेळी फावल्या वेळेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्यावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारची बॅटरी साडेआठ तासांत पूर्णपणे चार्ज होते. स्लो चार्जिंग बॅटरी असल्यामुळे ती कमीतकमी १० वर्ष तरी चालेल, असा दावा सुशील यांनी केलाय. 

"लॉकडाऊन लागलं तेव्ही मी घरीच होतो. लॉकडाऊन हटल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होणार याची कल्पना मला होती. त्यामुळे इलेक्ट्रीक कार बनविण्याचा विचार केला. यात मी स्वत:ला व्यग्र देखील ठेवू शकलो. कार तयार करण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ आणि काही पुस्तकांनी मदत घेतली", असं सुशील अग्रवाल म्हणाले. 

"लॉकडाऊनचा सदुपयोग त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार करण्यासाठी केला याचा मला आनंद आहे. या वाहनामुळे प्रदुषण होणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. हेच वाहनांचं भविष्य आहे", असं मयूरभंज येथील आरटीओचे प्रमुख गोपाल कृष्ण दास यांनी सांगितलं.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारFarmerशेतकरीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन