शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

नागली आता झालीय ‘फाइव्ह स्टार’ फूड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:50 IST

Nagli : ही गोष्ट आहे पश्चिम युगांडातली. त्या देशातल्या बनयोरो आणो बटुरो या समाजात जन्माला आलेल्या बाळाचं बारसं करण्याची एक खास पारंपरिक पद्धत असते.

मिलेट्स हा शब्द सध्या फार चर्चेत आहे. मिलेट्स खाणं आहारात कसं आवश्यक आहे, यावर व्हॉट्सॲप ज्ञान देणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात आणि मग कुणाला प्रश्न पडू शकतो की हे काय नवीन? खरंतर नवीन काहीच नाही, जे आपल्या आहारात पारंपरिक अन्न होतं, जे जगण्याचा भाग होतं ते बाजारपेठीय लाटांमध्ये हरवलं आणि आता पुन्हा तेच परत येऊ लागलं आहे. 

‘इट लोकल’चे नारे देताना भारतातही आपण मिलेट्स अर्थात भरड धान्य हरवून बसलो आहोत. बाजरी, नागली, ज्वारी, वेगवेगळे राळे हे सारे आता दुर्मीळ होऊ लागले आहे आणि जे आपल्याकडे तेच आफ्रिकी देशातही. त्या देशांच्या आहारात झाले बदल, कुपोषणाचे प्रश्न आणि हरवत चाललेले मिलेट्स हे प्रश्न गंभीर आहेत. भविष्यात अतिमहाग म्हणून हे पदार्थ फक्त फाइव्ह स्टार हॉटेलमध्येच मिळतील की काय, अशी शंका आहे. त्यातूनच आता काही चळवळी उभ्या राहत आहेत.

ही गोष्ट आहे पश्चिम युगांडातली. त्या देशातल्या बनयोरो आणो बटुरो या समाजात जन्माला आलेल्या बाळाचं बारसं करण्याची एक खास पारंपरिक पद्धत असते. तिचं नाव आहे ओकुरुका अमाबारा.  जन्माला आलेल्या बाळाच्या बारशासाठी सगळे गावकरी एकत्र जमतात. त्या बाळात कुठले गुण असावेत, याची चर्चा करतात आणि मग ते गुण दर्शवणारं नाव त्याला/ तिला ठेवतात. नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला की त्या बाळाच्या आईवडिलांना शेकोटीवर भाजलेली ताजी नाचणीची भाकरी आणि तुरीचं घट्ट वरण जेवायला वाढतात. त्यांच्या दृष्टीने ताजी नागलीची भाकरी ही नवीन आयुष्याचं प्रतीक आहे. बाळ जन्माला आल्याचा आनंद ते पोेषण यांची गोष्ट सांगणारी ही रीत.

पण आता जागतिक आहार लाटांमध्ये पारंपरिक अन्नच गायब होईल की काय, असं भय तिथंही स्थानिकांना आहेच. संपूर्ण युगांडा देशात ज्वारी, बाजरी, नाचणी अशी तृणधान्य पिढ्यानुपिढ्या लोकांचं प्रमुख अन्न. हीच बाब संपूर्ण आफ्रिका खंडालाही लागू पडते आणि बऱ्याचशा आशिया खंडालाही लागू पडते. युगांडामध्ये पारंपरिकरीत्या प्रत्येक कुटुंब शेती करतं, त्यात तृणधान्य पेरतं आणि कापणीच्या वेळी सगळा समाज, सगळं गाव एकत्र येतं, अशी खरंतर जुनी पद्धत; पण आता तिथंही तुरीचं वरण आणि बाजरी किंवा नाचणीची भाकरी हे आता घराघरातलं पारंपरिक अन्न राहिलेलं नाही आणि त्यामागचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे पर्यावरणातील बदल.

या तृणधान्यांचं पीक घेणं हे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. वातावरणातील बदलामुळे या पिकाची वाढ पाहिजे तशी होत नाही. त्याचं उत्पन्न अपेक्षेइतकं येत नाही आणि त्यामुळे या प्रकारच्या पिकांखालचं क्षेत्र जगभर आक्रसत चाललं आहे. आत्तापर्यंत टांझानिया देशातील किलीमांजारो पर्वताच्या उतारावर मिलेट प्रकारातील तृणधान्यांची शेतीच प्रामुख्याने केली जायची. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. गरिबांचं अन्न समजल्या जाणाऱ्या तृणधान्यांचंच नाही; तर कॉफी आणि ऍव्होकॅडोसारख्या तुलनेने श्रीमंती पदार्थ समजल्या जाणाऱ्या पिकांच्या लागवडीचं क्षेत्रदेखील घटताना दिसत आहे. 

युगांडामध्ये अलीकडे उन्हाळाही फार प्रखर असतो आणि पाऊसदेखील खूप प्रमाणात पडतो. दुष्काळ पडणं आणि पूर येणं, हेही बऱ्यापैकी नित्याचं झालेलं आहे. तृणधान्यांच्या उत्पादनावर या सगळ्याचा अपरिहार्यपणे परिणाम होतो. एकीकडे हे संकट असताना दुसरीकडे अनेक धान्य आणि पिकांच्या लक्षावधी स्थानिक प्रजाती वेगाने नामशेष होत चालल्या आहेत.  या प्रजातींमध्ये ओला आणि कोरडा दुष्काळ सहन करूनही टिकून राहण्याचे गुणधर्म असू शकतात. या वाणांचा अभ्यास करून हे गुणधर्म शेतीयोग्य वाणांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. मात्र त्यापूर्वीच त्या नामशेष होण्याचं भय आहेच.

सुरण आणि डांगरही  खायला मिळालं नाही तर?केनियामध्ये तर वेगळंच चित्र आहे. सुरण, रताळी, डांगर (लाल भोपळा) आणि कसावा (ज्यापासून साबुदाणा बनवतात) हे त्यांच्याकडचं पारंपरिक अन्न हळूहळू लोकांच्या आहारातून नाहीसं झालेलं दिसतंय. अशा प्रकारे पारंपरिक अन्न रोजच्या आहारातून नाहीसं होण्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा लोकांच्या पोषणावर होतो. विविध प्रकारच्या अन्नातून मिळणारे अन्नघटक न मिळाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आणि येणाऱ्या पिढ्यांचं हे नुकसान टाळायचं असेल तर नवनवीन पद्धतींचा वापर करून आपल्याला ही विविध तृणधान्य टिकवावीच लागतील; पण टिकणार कसे? हाच तर मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :foodअन्न