डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:13 AM2021-01-29T11:13:18+5:302021-01-29T11:13:45+5:30

या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य....

The Mystery of The Roopkund Lake | डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

Next

भारतात एक सरोवर आहे जे हळूहळू बर्फ वितळण्यासोबत आपल्या आत लपलेलं रहस्य बाहेर काढतं. या सरोवरात शेकडो मानवी सांगाडे आहेत. याचा नजारा सुंदर नाहीत भीतीदायक आहे. कारण या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य....यामागे अनेक थेअरी आहेत. अनेक कथा आहेत.

१९४२ मध्ये सापडलं हे सरोवर

या सरोवराचा शोध सर्वातआधी १९४२ मध्ये लागला होता. नंदा देवी गेम रिजर्वचे रेंजर एच.के.माधवल यांनी हे सरोवर शोधलं होतं. त्यानंतर नॅशलन जिओग्राफीने इथे एक टीम पाठवली होती आणि यातून ३० सांगाडे शोधून काढले होते. यानंतर इथे शेकडो सांगाडे सापडले आहेत. प्रत्येक लिंग आणि वयासोबतच इथे काही दागिने, चामड्याच्या चपला, बांगड्या, नखे, केस, मांस इत्यादींचेही अवशेष सापडले आहेत.

अनेक कथा आहे प्रचलित

या सरोवराबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, हे सांगाडे काश्मीरचा जनरल जोरावर सिंह आणि त्याच्या माणसांचे आहेत. असे म्हटले जाते की, १८४१ मध्ये जेव्हा तो तिबेट युद्धाहून परतत होता तेव्हा हिमालय क्षेत्रात रस्ता चुकला होता. यादरम्यान वातावरणही खराब झालं होतं. तो तिथे फसला आणि बर्फवृष्टीमुळे तिथेच मरण पावला.

एका दुसऱ्या कथेनुसार, हे सांगाडे भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जपानी सैनिकांचे आहेत. यावर रिसर्चही करण्यात आला. पण त्यातून समोर आले की, ही हाडे जपानी लोकांचे नाहीत. असेही सांगण्यात आले की, हे शेकडो वर्ष जुने सांगाडे आहेत.

धार्मिक कथाही आहेत

स्थानिक लोकांनुसार, कन्नोजचा राजा जसधवल आपली गर्भवती पत्नी राणी बलाम्पासोबत इथे तीर्थयात्रेवर निघाला होता. तो हिमालयात असलेल्या नंदा देवी मंदिरात मातेचं दर्शन घेण्यासाठी जात होता. असे सांगितले जाते की, राजाने दिखावा करत यात्रा केली. ज्यात ढोलही होते. लोकांनी त्याला असं करण्यास मनाई केली होती. पण त्याने ऐकलं नाही. असं केल्याने देवी नाराज होईल असंही त्याला सांगितलं. झालंही तसंच भयानक बर्फाचे मोठाले गोळे पडले आणि वादळ आलं. त्यामुळे राजा राणी सहीत सगळे लोक सरोवरात सामावले. पण याचे काहीही ठोस पुरावे सापडले नाहीत.

आश्चर्याची बाब म्हणजे अनेक सांगाड्यांच्या डोक्यावर फ्रॅक्चरही आहेत. एका रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं की, इथे ट्रेकर्सचा ग्रुप आला होता आणि अचानक वादळ आलं. असे म्हटले जाते की, बॉल इतक्या मोठ्या आकाराच्या गारा पडल्या होत्या. यातून कुणीही वाचू शकलं नाही कारण ३५ किलोमीटरपर्यंत कुठेही लपण्यासाठी जागा नव्हती. हे लोक सगळे लोक इथेच मरण पावले.

जेव्हा या सांगाड्यांचे एक्स-रे काढले तेव्हा यात फ्रॅक्चर असल्याचे समजले. हेच कारण होतं की, गारा पडल्याची थेअरी दिली गेली होती.

उलगडलं सांगाड्यांचं रहस्य

वैज्ञानिकांनुसार, या सरोवरात जवळपास २०० मानवी सांगाडे सापडले आहेत. जे ९व्या शतकातील भारतीय आदिवासी लोकांचे आहेत. असेही सांगण्यात आले की, यांचा मृत्यू भीषण गारांमुळे झाला होता. मात्र, आता वैज्ञानिकांना दुसऱ्या रिसर्चमध्ये आढळून आलं की हे सांगाडे दोन ग्रुपचे आहेत. यातील एका ग्रुपमध्ये एकाच परिवारातील सदस्य आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील लोक वेगळे आहेत आणि त्यांची उंची कमी आहे.

त्यासोबतच वैज्ञानिकांनी असे म्हटले की, सर्वांचा मृत्यू कोणत्याही लढाई किंवा हत्याराने झाला नाही. तर ते सर्व भीषण गारांमुळे डोक्याला मार लागल्याने मरण पावले आहेत. या गारांचा आकार खूप जास्त होता. एकंदर काय तर हे सरोवर आजही लोकांच्या मनात आकर्षण निर्माण करते. यासंबंधी कथा लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

Web Title: The Mystery of The Roopkund Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.