शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 10:30 IST

पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही.

कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा स्थितीतही काही लोक असेही आहेत जे समोर येणाऱ्या अडचणींना धाडसाने तोंड देत आहेत. अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. जी वाचून मनाला चटका नक्कीच बसेल. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. अशात पती १३ तासांचा प्रवास सायकलने प्रवास करून पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला.

इंदुरपासून १० किलोमीटर अंतरावर तलावलीमध्ये राहणारे रवि शंकर पंवार यांचं लग्न १९८६ मध्ये मालीपुरा आगर येथील सुमन यांच्यासोबत झालं होतं. मानसिक रूग्ण असल्याने सुमन या गेल्या काही महिन्यांपासून माहेरीच राहत होत्या. काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने सुमन यांची स्थिती गंभीर आणि नाजूक झाली होती. ८ मे रोजी सुमन यांचं निधन झालं. सुमन यांच्या कुटुंबियांनी रवि शंकर यांना ही दु:खद बातमी दिली. मात्र, रवि शंकर त्या दिवशी जाऊ शकत नव्हते. कारण त्यांची वहिणीं त्या दिवशी दहावं होतं. वहिणीचं कार्य पूर्ण करून रवि शंकर आगरला जाण्यासाठी वाहन शोधत होते. पण त्यांना काही मिळालं नाही. (हे पण वाचा : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत')

अशात प्लंबरचं काम करणारे रवि शंकर यांनी कसंही करून आगरला जाण्याचा आणि पत्नीला शेवटचं बघण्याचा निश्चय केला. सायंकाळी ५ वाजता ते आपल्या गावातून निघाले. रात्रीच्या अंधारात ते रस्त्यावर थर्माप्लास्टिकच्या पांढऱ्या पट्टीच्या आधारे सायकल चालवत सकाळी ७ वाजता आगरला पोहोचले. या प्रवासात त्यांनी केवळ १ तास आराम केला. रस्त्यात त्यांनी चहा, नाश्ता काही घेतलं नाही. कारण सगळीकडे दुकाने बंद होती.

रवि शंकर यांनी थोडं जेवण सोबत घेतलं होतं. ते त्यांनी रस्त्यात खाल्लं. पाणीही ते घरून घेऊन आले होते. मात्र, पाणी संपलं. पाण्याची गरज होती. पण त्यांनी हार मानली नाही. रवि शंकर यांना आगरला सायकलने येताना पाहून त्यांच्या सासरचे लोक थक्क झाले. रवि शंकर यांनी सांगितले की, जर रात्र नसती तर ते ७ तासात आगरला पोहोचले असते. इतका प्रवास करून रवि शंकर पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके