शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 10:30 IST

पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही.

कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा स्थितीतही काही लोक असेही आहेत जे समोर येणाऱ्या अडचणींना धाडसाने तोंड देत आहेत. अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. जी वाचून मनाला चटका नक्कीच बसेल. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. अशात पती १३ तासांचा प्रवास सायकलने प्रवास करून पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला.

इंदुरपासून १० किलोमीटर अंतरावर तलावलीमध्ये राहणारे रवि शंकर पंवार यांचं लग्न १९८६ मध्ये मालीपुरा आगर येथील सुमन यांच्यासोबत झालं होतं. मानसिक रूग्ण असल्याने सुमन या गेल्या काही महिन्यांपासून माहेरीच राहत होत्या. काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने सुमन यांची स्थिती गंभीर आणि नाजूक झाली होती. ८ मे रोजी सुमन यांचं निधन झालं. सुमन यांच्या कुटुंबियांनी रवि शंकर यांना ही दु:खद बातमी दिली. मात्र, रवि शंकर त्या दिवशी जाऊ शकत नव्हते. कारण त्यांची वहिणीं त्या दिवशी दहावं होतं. वहिणीचं कार्य पूर्ण करून रवि शंकर आगरला जाण्यासाठी वाहन शोधत होते. पण त्यांना काही मिळालं नाही. (हे पण वाचा : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत')

अशात प्लंबरचं काम करणारे रवि शंकर यांनी कसंही करून आगरला जाण्याचा आणि पत्नीला शेवटचं बघण्याचा निश्चय केला. सायंकाळी ५ वाजता ते आपल्या गावातून निघाले. रात्रीच्या अंधारात ते रस्त्यावर थर्माप्लास्टिकच्या पांढऱ्या पट्टीच्या आधारे सायकल चालवत सकाळी ७ वाजता आगरला पोहोचले. या प्रवासात त्यांनी केवळ १ तास आराम केला. रस्त्यात त्यांनी चहा, नाश्ता काही घेतलं नाही. कारण सगळीकडे दुकाने बंद होती.

रवि शंकर यांनी थोडं जेवण सोबत घेतलं होतं. ते त्यांनी रस्त्यात खाल्लं. पाणीही ते घरून घेऊन आले होते. मात्र, पाणी संपलं. पाण्याची गरज होती. पण त्यांनी हार मानली नाही. रवि शंकर यांना आगरला सायकलने येताना पाहून त्यांच्या सासरचे लोक थक्क झाले. रवि शंकर यांनी सांगितले की, जर रात्र नसती तर ते ७ तासात आगरला पोहोचले असते. इतका प्रवास करून रवि शंकर पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके