शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:26 IST

जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

Weird Love Story: प्रेम किती आंधळं असतं याचं उदाहरण अलवर जिल्ह्यात बघायला मिळालं. इथे एका महिलेने पती आणि पाच मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. हेच महिलेच्या प्रियकराने केलं. त्याने त्याच्या पाच मुलांना, आई-वडिलांना आणि पत्नीला सोडलं. दोघांनी लग्न केलं. हरयाणाच्या एका महिलेने लग्नाच्या 15 वर्षांनंतर आपल्या पाच मुलांना सोडून अलवरमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियकरासोबत निकाह केला. प्रियकर विवाहित आहे आणि त्यालाही पाच मुलं आहेत. जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरूवारी रात्री नूरजहां आणि मौसम खां जयपूरच्या हायकोर्टच्या माध्यमातून प्रोटेक्शन घेऊन अलवरला आले होते. नूरजहां म्हणाली की, तिने 3 महिन्यांआधी जयपूरमध्ये मौसम खांसोबत तिच्या मर्जीने निकाह केला. आता तिला 4 मुलांना बाल संरक्षण समितीकडे सोपवून जायचं आहे. एक मुलगा हरयाणामध्येच मजुरी करतो. पोलिसांनी नूरजहांला समजावण्याचा प्रयत्न केला. आधी तर ती मुलांना सोबत ठेवण्यासाठी तयार झाली, पण नंतर तिने नकार दिला. पोलीस शुक्रवारी सर्व मुलांना घेऊन अलवर बाल कल्याण समितीमध्ये आले. इथे कायदेशीर कारवाई करून मुलांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर नूरजहां आणि मौसम निघून गेले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरयाणाच्या खोहरी गावात राहणाऱ्या नूरजगांचं लग्न 15 वर्षाआधी अलवरमधील तैयबसोबत झालं होतं. नूरजहां म्हणाली की, तैयब ट्रक ड्रायव्हर आहे. तो घरी आणि जातो. ना तो तिची काळजी घेत ना मुलांची. रोज दारू पितो. अशी अनेक वर्ष तिने सहन केली. नंतर ती मुलांना घेऊन माहेरी गेली. 

नूरजहांचा प्रियकर मौसम अलवर जवळच्या तूलेडा गावात राहणारा आहे. त्यांची नातेवाईकाच्या माध्यमातून भेट झाली. मौसमची पत्नी आणि पाच मुलं तूलेडामध्ये राहतात. तर मौसम मजुरीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरतो. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनीही मुलांना सोडून निकाह केला.मौसमने सांगितलं की, तो त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही. नूरजहांला तो आपल्या सोबत ठेवेल. जिथे तो मजुरी करेल तिथे ते राहतील. तो म्हणाला की, 3 महिन्याआधी त्याने जयपूरमध्ये नूरजहांसोबत निकाह केला. त्यानंतर दोघेही तिच्या माहेरी राहिले.  

बाल संरक्षण समितीने नूरजहांला मुलांना सोबत ठेवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती यासाठी तयार झाली नाही. नूरजहांने दोन मुलींना बालिका आवासमध्ये पाठवलं. दोन मुलांना अलवरमध्ये बाल आवासमध्ये ठेवलं. समितीने मुलांची कस्टडी घेतली आहे. 11 वर्षीय सुनैना सहाव्या वर्गात शिकते. सुनैना म्हणाली की, तिला माहीत आहे की, आई मौसमसोबत राहणार. आमचं आता काय होईल माहीत नाही. आम्हाला आईसोबत रहायचं आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणाmarriageलग्नJara hatkeजरा हटके