शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पोट भरून टाकणारं, जिवाला तृप्ती देणारं खाणं म्हणजे मिसळ नंबर १

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 09:31 IST

चवीनं खाणाऱ्यांची पाहणी करून जगभरातील पारंपरिक शाकाहारी पदार्थांची (व्हेगन) यादी करण्याचा प्रयोग गेल्या आठवड्यात पार पडला. त्यात भारतीय पदार्थांत नंबर वन ठरली, मराठमोळी मिसळ. अशा ५० जागतिक पदार्थांच्या यादीत तिचा ११ वा नंबर लागला आहे. त्यानिमित्त मिसळीवर तर्रीबाज नजर...

मिलिंद बेल्हे

समोरच्या प्लेटमध्ये मटकी, मुगाची उसळ, त्यावर बटाटा, पोहे किंवा चिवड्याची मस्त पखरण, मिसळीशी सहज सलगी करेल असे फरसाण, त्यावर कांदा. शेजारी लिंबाची फोड आणि बाजूला झकास तर्री किंवा कट. शेजारी गुबगुबीत पावाची जोडी. असा जामानिमा पाहिला की कोणत्या खवय्याच्या तोंडाला पाणी सुटणार नाही...?

अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची नावे घेतली की, ती मिसळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्टँडजवळचं किंवा एखाद्या गल्लीत आडवाटेनं बसलेलं एखादं हॉटेल असावं. तिथं ऑर्डर दिल्यावर अख्ख्या गर्दीला ऐकू जाईल, अशा आवाजात मालकांनी एक मिस्सळ अशी आरोळी ठोकावी आणि समोर तांबडाजर्द तवंग मिरवणारी मिसळ ऐटीत येऊन बसावी. छोट्या प्लेटमध्ये असलेला मिसळीचा सारा संसार खालच्या मोठ्या प्लेटमध्ये ओतून घ्यावा. सगळा माल-मसाला मनाजोगता ढवळून घ्यावा. त्यावर तर्री ओतावी. लिंबू पिळावं. एकजीव करावं आणि पावाचा एक तुकडा मोडून मिसळीत बुडवून तसाच तोंडात कोंबावा. क्षणभर डोळे बंद करून घ्यावे आणि त्या घासाबरोबर मिसळीची चव जिभेवरून घोळवून घ्यावी. मिसळ जर झणझणीत असेल तर तर पहिल्याच घासाला लागणारा ठसका त्याची पोचपावती देऊन जातो. नंतर तोंड खवळून उठते. जिभेला धार येते. घाम फुटतो आणि एकामागोमाग पाव संपत राहतात. झकास ढेकर पोट भरल्याची पावती देतो. वर फक्कड चहा मारायचा. (हल्ली शहरी परंपरेत या सोबतीला ताक, खरवस, सरबत असे पदार्थ देऊन मिसळीची चव पार घालवून टाकतात.) अशी मिसळ ज्याने चाखलीय, तो तिला भारतात नंबर वन ठरवणारच. हे पोट भरून टाकणारं, जिवाला तृप्ती देणारं खाणं...

मिसळ खावी, तर ती मराठमोळ्या हॉटेलातच. भजीच्या तळलेल्या घाण्यातून उरलेले चिमणी-कावळे, कधी साध्या पोह्याऐवजी भाजक्या पोह्यांचा चिवडा, तिथेच रस्त्यावर उघडाबंब बसून कोणी एकाने घाणे भरून काढलेली शेव- गाठी... चमच्यानं न देता मुठीनं टाकलेला (की मारलेला?) कांदा आणि सर्वात बहार आणणारी त्या त्या हॉटेलची परंपरा जपणारी तर्री किंवा कट. त्याला तोटा नाही; पण तर्री मागितल्यावर छोट्याशा वाटीत जेव्हा लालरंगी मसालेदार पाणी आणून ठेवतात आणि त्याला, कांद्याला एक्स्ट्रा चार्ज लागेल, असे सांगतात, ते मिसळीचे खानदानी हॉटेलच नव्हे. 

त्यातही मटकीऐवजी कडधान्यातला हिरवा वाटाणा किंवा रगडा घालून जो मिसळ नावाचा पदार्थ दाक्षिणात्य किंवा उत्तर भारतीय हॉटेलांत मिळतो, ती मिसळ नव्हे. त्याला फारतर उसळ म्हणता येईल. त्यातही तिखट लागते म्हणून मिसळीच्या या शहरी अवतारावर दही घालून फरसाणाचा पार चिखल करून टाकतात. त्यातही काही ठिकाणचे फरसाण इतके कडक असते की मिसळीसोबत तेही शिजवले असते तरी चालले असते, अशी त्याची तऱ्हा. तिथली मिसळ जर त्या परदेशस्थांनी चाखली असती, तर मिसळीचा नंबर हमखास घसरला असता. 

सो स्पाइसी हवी ना? मुंबईत चांगली मिसळ शोधावीच लागते. येऊन-जाऊन तिच नावे समोर येतात आणि बोटाला तर्री लागेल म्हणून टिश्यू पेपर ठेवणाऱ्या... सो स्पाइसी म्हणत तिच्या तिखटपणाला नाके मुरडणाऱ्या,  पावाऐवजी ब्रेड खाणाऱ्या, काट्या-चमच्याने तिची चव चाखायला देणाऱ्या हॉटेलांत मिसळ खाणे अगदीच जिवावर येते. त्यातही उपवासाची मिसळ हा आणखी उपवासाचे पदार्थ एकत्र करून समोर येणारा आणि उपवास का केला, असा प्रश्न विचारायला लावणारा प्रकार. शिवाय त्याच्यासोबत जर पियुष असेल तर...? उपवास करणाऱ्यांनीच ती रिस्क घ्यावी. 

आणखी कोणते पदार्थ यादीत? भारतीय पदार्थांच्या यादीत मिसळीनंतर नंबर लागतो, तो आलू गोबी, राजमा, गोबी मंचुरियन, मसाला वडा, भेळ, राजमा-चावल, भेळपुरी यांचा; पण जशी मिसळीला एका विशिष्ट प्रांताची ओळख आहे, तशी या पदार्थांना नाही. काही पदार्थ तर इकडून-तिकडून येऊन त्या त्या प्रांतात हळूहळू विकसित झाले आहेत.

मिसळीत पूर्वी कोल्हापूरची, पुण्याची, खान्देशी, नगरी अशी वेगवेगळ्या चवीची ठिकाणे होती. एसटी स्टॅंडजवळची, गल्लीबोळातली ठिकाणे यात धरलेली नाहीत. त्यात आता वरचढ ठरतेय नाशिकची मिसळ. मिसळीचा सगळा जामानिमा मांडून सोबत तर्रीची मोठ्ठी वाटी किंवा लहानखुरी बादली... सोबतीला भरपूर कांदा-लिंबू... वा, क्या बात है! त्यातही कुणाला आणखी उसळ लागेल, कुणाला कांदा लागेल म्हणून अख्खी थाळी सोबत ठेवलेली. हल्ली मोठ्या शहरांत मिसळ महोत्सव होतात. त्यात त्या महोत्सवाचा सारा खर्च एकाच प्लेटच्या खर्चातून भरून काढायचा असल्यासारख्या त्याच्या किमती असतात. शिवाय वेळ सरत गेली की, तर्री पातळ होत जाते. त्यात तिखटाचा मारा केला जातो. तो प्रकार म्हणजे मिसळ नको; पण हात आवर म्हणणाऱ्यातला.