शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

एक मिस्ड कॉल अन् तरूणाचा 1300 किलोमीटरचा पायी प्रवास; कारण वाचून म्हणाल, क्या बात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:27 IST

एका तरूणाने भारीच कारनामा केलाय. तो अहमदाबाद ते बनारसपर्यंत पायी चालत गेला तेही एका मिस्ड कॉलमुळे.

प्रेमात लोक काहीही करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. सद्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास चालत करत आहेत. अशात अहमदाबादच्या एका तरूणाने भारीच कारनामा केलाय. तो अहमदाबाद ते बनारसपर्यंत पायी चालत गेला तेही एका मिस्ड कॉलमुळे.

'द लल्लनटॉप' वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ही कहाणी एखाद्या मजूराची नाही. तर हा तरूण त्याच्या गर्लफेन्डला भेटण्यासाठी 1300 किलोमीटरचा प्रवास करून केला. हा प्रवास त्याने पायी चालत केला. यातून हे पुन्हा एकदा बघायला मिळालं की, माणूस प्रेमात काहीही करतो.

12 मे च्या रात्रीची घटना आहे. मिर्जा मुराद पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तिची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला. मुलीचा मोबाइल स्ट्रेस करण्यात आला. लोकेशन बनारसमधीलच लंका परिसरातील दाखवलं. पोलीस तिथे पोहोचले. तेव्हा त्यांना कळालं की, मुलगी तिच्या मर्जीने बॉयफ्रेन्डला तिथे भेटण्यासाठी गेली होती.

पोलीस अधिकारी सुनील दत्त यांनी सांगितले की, 'मुलीची चौकशी केल्यावर तिने सांगितले की, मुलगा तसा मूळचा बनारसचाच आहे, पण अहमदाबादमध्ये राहून काम करत होता. चार-पाच महिन्यांपूर्वी एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. नंतर दोघांनी भेटण्याचा प्लॅन केला. पण लॉकडाऊन सुरू झालं. तरूणाला तरूणीला भेटायला यायचं होतं. पण त्याला ना गाडी मिळाली ना ट्रेन. मग काय तो पायी निघाला. तरूणीही त्याला भेटण्यासाठी गेली'.

सुनील दत्त यांनी सांगितले की, पोलिसांनी तरूण-तरूणीला विचारपूस केल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दोघेही वयस्क आहेत. तरूणाला पोलिसांनी सोडून दिलं तर तरूणीला तिच्या परिवाराकडे पाठवण्यात आलंय. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेahmedabadअहमदाबादVaranasiवाराणसी