शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मकर संक्रांती विशेष : मकरसंक्रांतीला काळे कपडे का घालतात लोक? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 15:18 IST

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात.

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. प्रत्येक वर्षाच्या १४ किंवा १५ जानेवारीला नित्य नेमाने मकर संक्रात येते. मकर संक्रांत म्हणजे सुर्याचे उत्तरायण सुरु होणं. सुर्याचा मकर राशीत संक्रमण. भारत विविधतेने नटलेला देश आहे असे आपण नेहमीच ऐकतो. अशातच या सणाबाबतही भारतामध्ये विविधता दिसून येते. मकर संक्रांतीचा दिवस संपूर्ण भारत खंडात वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. लोहडी, बिहु, पोंगल आणि अनेक नावं या सणाला दिलेली आहेत.  मकरसंक्रांत या वर्षी उद्या म्हणजेच १५ जानेवारीला आहे.  

मकरसंक्रांतीचा शुभमुहूर्त

मकरसंक्रांतीच्या तिथीनुसार वेळ १४ जानेवारीच्या मध्यरात्री  २ वाजून ७ मिनिटांनी सुरू होणार आहे. संक्रांतीचा शुभ मुहुर्त  सकाळी १५ जानेवारी सकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून ते २ वाजून  ७ मिनिटांपर्यंत आहे. हा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते. दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. सर्वांच्या घरी तिळाच्या लाडूंची रेलचेल असते. संक्रांत साजरी करण्यामागील भौगोलिक कारण म्हणजे, सुर्याचा उत्तरेकडील प्रवास. या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते. तसेच हिवाळा कमी होऊन थंडीही कमी होते. तसेच दिवस मोठा होऊन रात्री छोटी होत जाते. या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व असते. 

काळ्या कपड्यांचे महत्त्व

संक्रांतीच्या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व देण्यात येते. विशेषतः नववधू आणि लहान मुलं यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी काळे कपडे परिधान करण्यामागे असं कारण सांगितलं जातं की, ही वस्त्र उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी झबली दिसू लागतात. 

नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्व देण्यात येते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीला नववधूसाठी खास काळ्या रंगाची साडी घेण्यात येते. तसेच तिला हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगितले जाते. या दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावण्यात येतं. त्यांना तिळगुळ किंवा तिळाच्या वड्या दिल्या जातात. तसेच एखादी वस्तूही वाण म्हणून देण्यात येते. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं. परंतु काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय. 

लहान मुलांचे 'बोर न्हाण'

संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' करण्यात येते. यावेळी एका पाटावर बाळाला बसवलं जातं. त्याच्याभोवती इतर लहान मुलांना बसवलं जातं. त्याला काळ झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बासरी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जातं. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या पदार्थांचा अभिषेक करण्यात येतो. 

पतंगोत्सव

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागील उद्दीष्ट म्हणजे, सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानामध्ये जातो. त्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये जाता येते.  

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीIndian Festivalsभारतीय सणReligious programmeधार्मिक कार्यक्रम