शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:40 IST

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता.

(Image Credit : bhaskar.com)

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. आजपासून ५७ वर्षांपूर्वी कंपनी कमांडर शैतान सिंह यांनी रेजांगलामधील युद्धात केवळ लडाखला वाचवले नाही तर चीनला मात देऊन आपलं नाव नेहमीसाठी इतिहासाच्या पानांवर अमर केलं.

लडाखच्या चुशूल घाटीची जबाबदारी १३ कुमाऊंच्या एक तुकडीकडे होती. १२४ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व मेजर शैतान सिंह करत होते. शैतान सिंहाकडे जवान कमी होते. पण त्यांच्याकडे ध्येर्य कमी नव्हतं. १८ नोव्हेंबर १९६२ ला लडाखच्या चुशुल घाटीवर बर्फाची चादर पसरलेली होती. सगळीकडे शांतता होती. भारतीय जवान नेहमीप्रमाणे आपापल्या जागी तैनात होते. अशाच अचानक तोफांचा धमाका झाला.

(Image Credit : bhaskar.com)

चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या जवळपास ५ ते ६ हजार जवानांनी हल्ला केला होता. यादरम्यान शैतान सिंह यांनी हुशारी दाखवत आपल्या जवानांना सतर्क केलं. जवान कमी असूनही शैतान सिंह यांनी जीवाची पर्वा न करता चीनी जवानांचा सामना केला. चीनकडून भारतीय जवानांवर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणाच हल्ला चढवला, पण भारतीय जवान डगमगले नाही.

चीनकडून लागोपाठ होत असलेल्या फायरिंगमुळे शैतान सिंह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आपल्या जवानांना प्रोत्साहन देत होते. यादरम्यान शैतान सिंह यांनी जवानांना चीनी सैनिकांवर हलका गोळीबार करण्यास आणि त्यांना गुंतवून ठेवण्यास तसेच त्यांचा गोळा-बारूद संपेपर्यंत वाट बघण्याचा आदेश दिला. जवानांनी तसंच केलं.

(Image Credit : bhaskar.com)

जेव्हा चीनी सैनिकांचा गोळा-बारूद कमी झाला तेव्हा शैतान सिंह यांच्या तुकडीने चीनी जवानांवर जोरदार हल्ला केला. भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवत चीनच्या १३०० चीनी जवानांचा खात्मा केला. पण यादरम्यान ३ कुमाऊं बटालियनच्या ११४ जवानही शहीद झाले. यात शैतान सिंह यांचाही समावेश होता.

(Image Credit : thelallantop.com)

भारतीय सैनिकांसमोर यावेळी केवळ चीनचे मोठ्या प्रमाणातील सैनिक नव्हते, तर भौगोलिक परिस्थिती आणि बर्फाची समस्या देखील होती. तरी सुद्धा भारतीय सैनिकांनी चीनच्या सेनेसोबत दमदार मात दिली. १८ हजार फूट उंच पोस्टवर झालेल्या या युद्धात भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर चीनी सैनिकांनी हार मानली होती.

(Image : jagran.com)

लडाखला वाचवण्यासाठी रेजांगला पोस्टवर दाखवलेल्या शौर्यासाठी भारत सरकारने कंपनी कमांडर मेजर शैतान सिंह यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काने सन्मानित केले. याच बटालियनमधील ८ जवानांना 'वीर चक्र', तर ४ जवानांना 'सेना मेडल' आणि एका जवानाला 'मॅंशन इन डिस्पेच'ने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाखInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स