शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:24 IST

इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

जगभरातील लोक महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि आदर्शांची प्रशंसा करतात. सत्य आणि अहिंसेचे पुजारी बापूंच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात आला. भारताने हा लिलाव रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण रोखता आला नाही. बापूंचे रक्ताचे नमूने, शॉल, चप्पल, भाताचा कटोरा, मूत्यूपत्र, आणि पॉवर ऑप अटॉर्नीसारख्या वस्तूंचा लिलाव करून लिलाव करणाऱ्या संस्थेने २ कोटी ५१ लाख ६४ हजार रूपये कमावले होते. त्यानंतर त्यांची टोपी, चरखा, तुळशीची माळ आणि चष्म्याचाही लिलाव करण्यात आला होता. 

गांधीजींचं मृत्यूपत्र

गांधीजींच्या मृत्यूपत्राचा लिलाव ४६,१३,४०० रूपयांनी करण्यात आला होता. हे मृत्यूपत्र ३३ लाखात विकलं जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

रक्ताचे नमूने

बापूंच्या रक्ताच्या नमून्याला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे केवळ ५,८७,००० रूपये मिळाले होते. हा नमूना १९२४ मध्ये मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला होता. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये बापूंचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. (हे पण वाचा : ३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?)

बापूंचं पत्र

बापूंनी १९४३ मध्ये लिहिलेल्या एका पत्राने लिलावात वर्ल रेकॉर्ड केला होता. हे पत्र एका ललाख १५ हजार पौंडला विकलं गेलं होतं.

रक्ताने माखलेली माती आणि गवत

लिलावकर्त्यांनी बापूंच्या हत्येवळी त्यांच्या रक्ताने माखलेली माती आणि तेथील गवताचाही लिलाव केला होता. त्यांची चामड्याची चप्पल लिलावात १९ हजार पौंडला विकली गेली होती. तर त्यांची तुळशीची माळ ९५०० पौंडला विकली गेली होती.

पावर ऑफ अटर्नी

बापूंची पॉवर ऑफ अटर्नी ज्यावर भारतीय बॅंक ऑफ बडौदाची मोहर होती. ही पॉवर ऑफ अटर्नी लिलावात २५ हजार पौंडला विकली गेली होती.

बापूंची सही

बापूंचा एका फोटो ज्यावर त्यांनी सही केली होती. या फोटोला आणि सहीला अपेक्षेपेक्षा जास्त ४० हजार पौंड इतकी किंमत मिळाली होती. तर बापूंची रामायणाची खाजगी प्रत ३५०० पौंडला विकली गेली होती.

चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी

भारताच्या लाख हस्तक्षेपानंतरही जेव्हा गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव थांबला नाही तेव्हा भारतीय उद्योगपती विजय माल्याने लिलावात सहभाग घेऊन काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्याने १८ लाख डॉलर देऊन त्यांचा चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी खरेदी केली होती.

बापूंचा चरखा

महात्मा गांधी यांच्या प्रिय वस्तूंपैकी एका चरख्याचा लिलाव ब्रिटनमध्ये करण्यात आला होता. या चरख्याचा वापर ते भारत छोडो आंदोलनादरम्यान यरवडा तुरूंगात करत होते. त्यावेळी या चरख्याला १,१०,००० पौंड म्हणजे १,०८७,५७०० इतकी किंमत मिळाली होती.

बापूंचा चष्मा

बापूंच्या चष्म्याचा लिलाव २ कोटी ५५ लाख रूपयात झाला होता.  ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये गाधींजींच्या चष्म्याचा लिलाव करण्यात आला होता. हा चष्मा त्यांना त्यांच्या काकांनी दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना दिला होता. हा काळ १९१० ते १९३० च्या दरम्यानचा होता.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास