शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बापूंच्या 'या' वस्तूंचा कोट्यावधी रूपयांमध्ये झाला लिलाव, प्रयत्न करूनही वाचवू शकला नाही भारत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:24 IST

इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

जगभरातील लोक महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि आदर्शांची प्रशंसा करतात. सत्य आणि अहिंसेचे पुजारी बापूंच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, इतक्या वर्षानंतरही त्यांच्या विचारांची उपासना केली जाते. याच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. जे आजही जगातल्या कानाकोपऱ्यात जिवंत आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात आला. भारताने हा लिलाव रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण रोखता आला नाही. बापूंचे रक्ताचे नमूने, शॉल, चप्पल, भाताचा कटोरा, मूत्यूपत्र, आणि पॉवर ऑप अटॉर्नीसारख्या वस्तूंचा लिलाव करून लिलाव करणाऱ्या संस्थेने २ कोटी ५१ लाख ६४ हजार रूपये कमावले होते. त्यानंतर त्यांची टोपी, चरखा, तुळशीची माळ आणि चष्म्याचाही लिलाव करण्यात आला होता. 

गांधीजींचं मृत्यूपत्र

गांधीजींच्या मृत्यूपत्राचा लिलाव ४६,१३,४०० रूपयांनी करण्यात आला होता. हे मृत्यूपत्र ३३ लाखात विकलं जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

रक्ताचे नमूने

बापूंच्या रक्ताच्या नमून्याला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे केवळ ५,८७,००० रूपये मिळाले होते. हा नमूना १९२४ मध्ये मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला होता. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये बापूंचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. (हे पण वाचा : ३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?)

बापूंचं पत्र

बापूंनी १९४३ मध्ये लिहिलेल्या एका पत्राने लिलावात वर्ल रेकॉर्ड केला होता. हे पत्र एका ललाख १५ हजार पौंडला विकलं गेलं होतं.

रक्ताने माखलेली माती आणि गवत

लिलावकर्त्यांनी बापूंच्या हत्येवळी त्यांच्या रक्ताने माखलेली माती आणि तेथील गवताचाही लिलाव केला होता. त्यांची चामड्याची चप्पल लिलावात १९ हजार पौंडला विकली गेली होती. तर त्यांची तुळशीची माळ ९५०० पौंडला विकली गेली होती.

पावर ऑफ अटर्नी

बापूंची पॉवर ऑफ अटर्नी ज्यावर भारतीय बॅंक ऑफ बडौदाची मोहर होती. ही पॉवर ऑफ अटर्नी लिलावात २५ हजार पौंडला विकली गेली होती.

बापूंची सही

बापूंचा एका फोटो ज्यावर त्यांनी सही केली होती. या फोटोला आणि सहीला अपेक्षेपेक्षा जास्त ४० हजार पौंड इतकी किंमत मिळाली होती. तर बापूंची रामायणाची खाजगी प्रत ३५०० पौंडला विकली गेली होती.

चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी

भारताच्या लाख हस्तक्षेपानंतरही जेव्हा गांधीजींच्या वस्तूंचा लिलाव थांबला नाही तेव्हा भारतीय उद्योगपती विजय माल्याने लिलावात सहभाग घेऊन काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्याने १८ लाख डॉलर देऊन त्यांचा चष्मा, घड्याळ, चप्पल, ताट आणि वाटी खरेदी केली होती.

बापूंचा चरखा

महात्मा गांधी यांच्या प्रिय वस्तूंपैकी एका चरख्याचा लिलाव ब्रिटनमध्ये करण्यात आला होता. या चरख्याचा वापर ते भारत छोडो आंदोलनादरम्यान यरवडा तुरूंगात करत होते. त्यावेळी या चरख्याला १,१०,००० पौंड म्हणजे १,०८७,५७०० इतकी किंमत मिळाली होती.

बापूंचा चष्मा

बापूंच्या चष्म्याचा लिलाव २ कोटी ५५ लाख रूपयात झाला होता.  ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये गाधींजींच्या चष्म्याचा लिलाव करण्यात आला होता. हा चष्मा त्यांना त्यांच्या काकांनी दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना दिला होता. हा काळ १९१० ते १९३० च्या दरम्यानचा होता.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास