शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

अश्रूंचा बांध फुटला, भारत-पाक फाळणीनंतर दुरावलेल्या भावांची ७४ वर्षांनी गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 10:35 IST

भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे

नवी दिल्ली – १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीवेळी अनेक कुटुंब विखुरली गेली. त्यातीलच एक मोहम्मद सिद्दिकी. सिद्दिकी यांचे भाऊ हबीब उर्फ शेला फाळणीनंतर भारतातच राहिले. आता ७४ वर्षानंतर करतारपूर कॉरिडोर, जे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारत यांना जोडतं, त्याने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून अनेक जण खूप भावूक झालेत. या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिद्दिकी पाकिस्तानीच्या फैसलाबाद येथे राहतात तर त्यांचा भाऊ भारताच्या पंजाब प्रांतात राहतात. करतारपूरमध्ये दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर भावूक झाले. एकमेकांची गळाभेट केली तेव्हा अश्रूंचा बांध फुटला. इतक्या वर्षांनी दोघांची भेट झाली होती.

सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दोन्ही भाऊ करतारपूर कॉरिडोरमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही लोकं आहेत. व्हिडिओत दोघंही एकमेकांना भावूक होऊन मिठी मारताना दिसून येतात. या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान सरकारला करतारपूर कॉरिडोर उघडल्याबद्दल आभार मानले आहेत. कॉरिडोरच्या माध्यमातून भारताचे लोक विना व्हिसा पाकिस्तानच्या करतारपूर येथे जाऊ शकतात. हा कॉरिडोर २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सुरु झाला होता.

ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. मागील वर्षीही एकमेकांपासून दुरावलेल्या दोन मित्रांची भेट ७३ वर्षांनी झाली होती. भारतात राहणाऱ्या सरदार गोपाल सिंह यांचा लहानपणीचा मित्र पाकिस्तानातील मोहम्मद बशीर हे दोघंही फाळणीनंतर एकमेकांपासून दूर गेले. या दोघांचीही भेट करतारपूर कॉरिडोरमुळे झाली होती. भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. यालाच करतारपूर साहिब कॉरिडोर म्हणतात. करतारपूर साहिब हे शीख धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यात ते आहे. तर करतारपूरला पहिला गुरुद्वारा मानलं जातं. ज्याचा पाया गुरु नानक देव जी यांनी रचला होता. याठिकाणी माथा टेकवण्यासाठी भारतातून अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी पाकिस्तानात जात असतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान