शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अश्रूंचा बांध फुटला, भारत-पाक फाळणीनंतर दुरावलेल्या भावांची ७४ वर्षांनी गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 10:35 IST

भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे

नवी दिल्ली – १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीवेळी अनेक कुटुंब विखुरली गेली. त्यातीलच एक मोहम्मद सिद्दिकी. सिद्दिकी यांचे भाऊ हबीब उर्फ शेला फाळणीनंतर भारतातच राहिले. आता ७४ वर्षानंतर करतारपूर कॉरिडोर, जे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारत यांना जोडतं, त्याने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून अनेक जण खूप भावूक झालेत. या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिद्दिकी पाकिस्तानीच्या फैसलाबाद येथे राहतात तर त्यांचा भाऊ भारताच्या पंजाब प्रांतात राहतात. करतारपूरमध्ये दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर भावूक झाले. एकमेकांची गळाभेट केली तेव्हा अश्रूंचा बांध फुटला. इतक्या वर्षांनी दोघांची भेट झाली होती.

सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दोन्ही भाऊ करतारपूर कॉरिडोरमध्ये दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही लोकं आहेत. व्हिडिओत दोघंही एकमेकांना भावूक होऊन मिठी मारताना दिसून येतात. या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान सरकारला करतारपूर कॉरिडोर उघडल्याबद्दल आभार मानले आहेत. कॉरिडोरच्या माध्यमातून भारताचे लोक विना व्हिसा पाकिस्तानच्या करतारपूर येथे जाऊ शकतात. हा कॉरिडोर २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सुरु झाला होता.

ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. मागील वर्षीही एकमेकांपासून दुरावलेल्या दोन मित्रांची भेट ७३ वर्षांनी झाली होती. भारतात राहणाऱ्या सरदार गोपाल सिंह यांचा लहानपणीचा मित्र पाकिस्तानातील मोहम्मद बशीर हे दोघंही फाळणीनंतर एकमेकांपासून दूर गेले. या दोघांचीही भेट करतारपूर कॉरिडोरमुळे झाली होती. भारतातील पंजाबच्या डेरा बाबा नानकपासून पाक सीमेपर्यंत कॉरिडोर बनला आहे. तर पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. यालाच करतारपूर साहिब कॉरिडोर म्हणतात. करतारपूर साहिब हे शीख धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यात ते आहे. तर करतारपूरला पहिला गुरुद्वारा मानलं जातं. ज्याचा पाया गुरु नानक देव जी यांनी रचला होता. याठिकाणी माथा टेकवण्यासाठी भारतातून अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी पाकिस्तानात जात असतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान