शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शाही लग्न झालं; मधुचंद्राच्या रात्री नवरी पतीला म्हणाली - मी दुसऱ्या तरूणाच्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:24 IST

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवरदेवाला असं काही सांगितलं की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ज्यानंतर दोघांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

लग्न आणि लग्नासंबंधी अनेक अजब घटना समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका कपलचं लग्न ठरलं होतं. दोन्ही परिवार श्रीमंत. अशात लग्नही कोट्यावधी रूपये खर्च करून शाही पद्धतीने झालं. वरात विमानाने गोव्याला नेली गेली. एका मोठ्या रिसॉर्टमध्ये नवर-नवरदेवाने सात फेरे घेतले. हे सगळं व्यवस्थित झालं. पण लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवरदेवाला असं काही सांगितलं की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ज्यानंतर दोघांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने नवरीला सांगितलं की, तिचं एका दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे आणि तिने हे लग्न कुटुंबियांच्या दबावामुळे केलं. यानंतर कपलमध्ये वाद झाला. वाद पोलीस आणि नंतर कोर्टात पोहोचला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. नवरदेवाने नवरीवर फसवणुकीचा आरोप केला तर नवरीने नवरदेवावर मारहाण आणि हुंड्याचा आरोप केला. 

हे प्रकरण 26 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालं होतं. कानपूरच्या आयुष खेमकाचं लग्न एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत झालं होतं. दोन्ही कुटुंब श्रीमंत आणि एकाच जातीचे आहेत. लग्न शाही पद्धतीने करण्यात आलं. पाहुण्यांना लग्नासाठी विमानाने गोव्याला नेण्यात आलं. आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.

पण आयुषचं म्हणणं आहे की, लग्नानंतर नवरीने त्याला सांगितलं की, तिने हे लग्न तिने दबावात केलं आणि तिचं दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे. याच्या काही दिवसांनी नवरीच्या प्रियकराचं तिच्या सासरी येणं-जाणं सुरू झालं. आयुषने पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढला.

आयुष म्हणाला की, बदनामी होईल किंवा माझी इज्जत निघेल म्हणून मी पत्नीची बाब कुणालाच सांगितली नाही. तिने सुहागरातच्या दिवशीच हे सांगितलं होतं ती मला तिच्या शरीराला हात लावू देणार नाही आणि माझी पत्नी बनून राहणार नाही. पण जेव्हा मी विरोध केला तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. नंतर मामा आणि नातेवाईकांना बोलवून मला मारहाण केली गेली. सोबतच घरातील दागिनेही घेऊन गेले.

याबाबत आयुषने पोलिसात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. कारण आयुषच्या पत्नीचा मामा शहरातील मोठा व्यापारी आहे. उलट सीसीटीव्ही इत्यादी पुरावे गायब केले आणि चुकीचा जबाब देऊन फायनल रिपोर्ट लावला. ज्यावर आयुषने कोर्टात अपील केली. कोर्टाच्या आदेशावरून ही केस एसीपी अनवरगंजकडे सोपवण्यात आली आहे.

तेच आयुषच्या पत्नीकडील लोक यावर काहीच बोलायला तयार नाहीत. पण त्यांनी त्यांच्या तक्रारीत आयुषवर आणि त्याच्या परिवारावर हुंड्यासाठी छळ, मारहाण, शोषण, धमकी देण्यासारखे गंभीर आरोप केले. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कानपूरमधील हे हाय-प्रोफाइल लग्न कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात अडकलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न