शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गोव्यात शाही लग्न झालं; मधुचंद्राच्या रात्री नवरी पतीला म्हणाली - मी दुसऱ्या तरूणाच्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:24 IST

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवरदेवाला असं काही सांगितलं की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ज्यानंतर दोघांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

लग्न आणि लग्नासंबंधी अनेक अजब घटना समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका कपलचं लग्न ठरलं होतं. दोन्ही परिवार श्रीमंत. अशात लग्नही कोट्यावधी रूपये खर्च करून शाही पद्धतीने झालं. वरात विमानाने गोव्याला नेली गेली. एका मोठ्या रिसॉर्टमध्ये नवर-नवरदेवाने सात फेरे घेतले. हे सगळं व्यवस्थित झालं. पण लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवरदेवाला असं काही सांगितलं की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ज्यानंतर दोघांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने नवरीला सांगितलं की, तिचं एका दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे आणि तिने हे लग्न कुटुंबियांच्या दबावामुळे केलं. यानंतर कपलमध्ये वाद झाला. वाद पोलीस आणि नंतर कोर्टात पोहोचला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. नवरदेवाने नवरीवर फसवणुकीचा आरोप केला तर नवरीने नवरदेवावर मारहाण आणि हुंड्याचा आरोप केला. 

हे प्रकरण 26 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालं होतं. कानपूरच्या आयुष खेमकाचं लग्न एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत झालं होतं. दोन्ही कुटुंब श्रीमंत आणि एकाच जातीचे आहेत. लग्न शाही पद्धतीने करण्यात आलं. पाहुण्यांना लग्नासाठी विमानाने गोव्याला नेण्यात आलं. आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.

पण आयुषचं म्हणणं आहे की, लग्नानंतर नवरीने त्याला सांगितलं की, तिने हे लग्न तिने दबावात केलं आणि तिचं दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे. याच्या काही दिवसांनी नवरीच्या प्रियकराचं तिच्या सासरी येणं-जाणं सुरू झालं. आयुषने पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढला.

आयुष म्हणाला की, बदनामी होईल किंवा माझी इज्जत निघेल म्हणून मी पत्नीची बाब कुणालाच सांगितली नाही. तिने सुहागरातच्या दिवशीच हे सांगितलं होतं ती मला तिच्या शरीराला हात लावू देणार नाही आणि माझी पत्नी बनून राहणार नाही. पण जेव्हा मी विरोध केला तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. नंतर मामा आणि नातेवाईकांना बोलवून मला मारहाण केली गेली. सोबतच घरातील दागिनेही घेऊन गेले.

याबाबत आयुषने पोलिसात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. कारण आयुषच्या पत्नीचा मामा शहरातील मोठा व्यापारी आहे. उलट सीसीटीव्ही इत्यादी पुरावे गायब केले आणि चुकीचा जबाब देऊन फायनल रिपोर्ट लावला. ज्यावर आयुषने कोर्टात अपील केली. कोर्टाच्या आदेशावरून ही केस एसीपी अनवरगंजकडे सोपवण्यात आली आहे.

तेच आयुषच्या पत्नीकडील लोक यावर काहीच बोलायला तयार नाहीत. पण त्यांनी त्यांच्या तक्रारीत आयुषवर आणि त्याच्या परिवारावर हुंड्यासाठी छळ, मारहाण, शोषण, धमकी देण्यासारखे गंभीर आरोप केले. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कानपूरमधील हे हाय-प्रोफाइल लग्न कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात अडकलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न