शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एक असा किल्ला जेथून दुश्मनांवर केला गेला होता चांदीच्या तोफगोळ्यांनी हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:15 IST

आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही.

प्राचीन काळात राजे आपल्या राजे आपल्या राज्यातील किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असायचे. सोनं आणि चांदीपेक्षाही किल्ल्याला अधिक महत्व दिलं जात होतं. आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही आणि घडणारही नाही.

आम्ही तुम्हाला सांगतोय चुरू किल्ल्याबाबत. हा किल्ला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आहे. १६९४ मध्ये ठाकूर कुशल सिंह यांनी हा किल्ला बांधून घेतला होता. या किल्ल्याच्या निर्माणामागील उद्देश आत्मसुरक्षा आणि सोबत राज्यातील जनतेला सुरक्षा प्रदान करणे हा होता.

हा जगातला एकमेव असा किल्ला आहे जिथे युद्धादरम्यान गोळा बारूद संपल्यावर तोफेतून दुश्मनांवर चांदीच्या गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता. ही इतिहासातील फार हैराण करणारी घटना होती. ही घटना होती १८१४ मधील. त्यावेळी किल्ला ठाकूर कुशल सिंह यांचे वंशज ठाकूर शिवजी सिंह यांच्या ताब्यात होता.

इतिहासकारांनुसार ठाकूर शिवजी सिंह यांच्या सेनेत २०० पायदळ आणि २०० घोडेस्वार सैनिक होते. पण युद्धा सेनेची संख्या अचानक वाढत होती. कारण इथे राहणारे लोक राजासाठी काहीही करायला तयार होते. त्यामुळे हे लोक एका सैनिकासारखे दुश्मनांसोबत लढत होते.

केवळ इतकंच नाही तर ठाकूर शिवजी सिंह यांची प्रजा आपल्या राजासाठी आणि राज्याच्या सुरक्षेसाठी आपली संपत्तीही लुटवत होते. १८१४ चा ऑगस्ट महिना होता. बीकानेरचे राजा सूरत सिंह यांनी चुरू किल्ल्यावर हल्ला केला होता. इकडे ठाकूर शिवजी सिंह जोरदार मुकाबला करत होते. पण काही दिवसांनी त्यांच्याकडील गोळा-बारूद संपलं.

युद्ध सुरू असतानाच गोळा-बारूद संपल्याने राजाची चिंता वाढली.  मात्र, प्रजेने त्यांना भरपूर साथ दिली आणि राज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने देऊन टाकले. या दागिन्यांपासून तोफ गोळे तयार करण्यात आले. ठाकूर शिवजी सिंह यांनी सैनिकांना आदेश दिले की, दुश्मनांवर तोफांमधून चांदीचे गोळे टाका.  याचा परिणाम असा झाला की, दुश्मनांच्या सेनेने हार मानली आणि ते तेथून पळून गेले. ही घटना चुरूच्या इतिहासात अमर आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास