शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक असा किल्ला जेथून दुश्मनांवर केला गेला होता चांदीच्या तोफगोळ्यांनी हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:15 IST

आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही.

प्राचीन काळात राजे आपल्या राजे आपल्या राज्यातील किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असायचे. सोनं आणि चांदीपेक्षाही किल्ल्याला अधिक महत्व दिलं जात होतं. आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही आणि घडणारही नाही.

आम्ही तुम्हाला सांगतोय चुरू किल्ल्याबाबत. हा किल्ला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आहे. १६९४ मध्ये ठाकूर कुशल सिंह यांनी हा किल्ला बांधून घेतला होता. या किल्ल्याच्या निर्माणामागील उद्देश आत्मसुरक्षा आणि सोबत राज्यातील जनतेला सुरक्षा प्रदान करणे हा होता.

हा जगातला एकमेव असा किल्ला आहे जिथे युद्धादरम्यान गोळा बारूद संपल्यावर तोफेतून दुश्मनांवर चांदीच्या गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता. ही इतिहासातील फार हैराण करणारी घटना होती. ही घटना होती १८१४ मधील. त्यावेळी किल्ला ठाकूर कुशल सिंह यांचे वंशज ठाकूर शिवजी सिंह यांच्या ताब्यात होता.

इतिहासकारांनुसार ठाकूर शिवजी सिंह यांच्या सेनेत २०० पायदळ आणि २०० घोडेस्वार सैनिक होते. पण युद्धा सेनेची संख्या अचानक वाढत होती. कारण इथे राहणारे लोक राजासाठी काहीही करायला तयार होते. त्यामुळे हे लोक एका सैनिकासारखे दुश्मनांसोबत लढत होते.

केवळ इतकंच नाही तर ठाकूर शिवजी सिंह यांची प्रजा आपल्या राजासाठी आणि राज्याच्या सुरक्षेसाठी आपली संपत्तीही लुटवत होते. १८१४ चा ऑगस्ट महिना होता. बीकानेरचे राजा सूरत सिंह यांनी चुरू किल्ल्यावर हल्ला केला होता. इकडे ठाकूर शिवजी सिंह जोरदार मुकाबला करत होते. पण काही दिवसांनी त्यांच्याकडील गोळा-बारूद संपलं.

युद्ध सुरू असतानाच गोळा-बारूद संपल्याने राजाची चिंता वाढली.  मात्र, प्रजेने त्यांना भरपूर साथ दिली आणि राज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने देऊन टाकले. या दागिन्यांपासून तोफ गोळे तयार करण्यात आले. ठाकूर शिवजी सिंह यांनी सैनिकांना आदेश दिले की, दुश्मनांवर तोफांमधून चांदीचे गोळे टाका.  याचा परिणाम असा झाला की, दुश्मनांच्या सेनेने हार मानली आणि ते तेथून पळून गेले. ही घटना चुरूच्या इतिहासात अमर आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास