शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

एक असा किल्ला जेथून दुश्मनांवर केला गेला होता चांदीच्या तोफगोळ्यांनी हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:15 IST

आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही.

प्राचीन काळात राजे आपल्या राजे आपल्या राज्यातील किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असायचे. सोनं आणि चांदीपेक्षाही किल्ल्याला अधिक महत्व दिलं जात होतं. आज तुम्हाला एका अशा किल्ल्याबाबत सांगणार आहोत जो इतिहासात अमर आहे. कारण या किल्ल्यावर जी घटना घडली होती ती जगात कुठेही घडली नाही आणि घडणारही नाही.

आम्ही तुम्हाला सांगतोय चुरू किल्ल्याबाबत. हा किल्ला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आहे. १६९४ मध्ये ठाकूर कुशल सिंह यांनी हा किल्ला बांधून घेतला होता. या किल्ल्याच्या निर्माणामागील उद्देश आत्मसुरक्षा आणि सोबत राज्यातील जनतेला सुरक्षा प्रदान करणे हा होता.

हा जगातला एकमेव असा किल्ला आहे जिथे युद्धादरम्यान गोळा बारूद संपल्यावर तोफेतून दुश्मनांवर चांदीच्या गोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता. ही इतिहासातील फार हैराण करणारी घटना होती. ही घटना होती १८१४ मधील. त्यावेळी किल्ला ठाकूर कुशल सिंह यांचे वंशज ठाकूर शिवजी सिंह यांच्या ताब्यात होता.

इतिहासकारांनुसार ठाकूर शिवजी सिंह यांच्या सेनेत २०० पायदळ आणि २०० घोडेस्वार सैनिक होते. पण युद्धा सेनेची संख्या अचानक वाढत होती. कारण इथे राहणारे लोक राजासाठी काहीही करायला तयार होते. त्यामुळे हे लोक एका सैनिकासारखे दुश्मनांसोबत लढत होते.

केवळ इतकंच नाही तर ठाकूर शिवजी सिंह यांची प्रजा आपल्या राजासाठी आणि राज्याच्या सुरक्षेसाठी आपली संपत्तीही लुटवत होते. १८१४ चा ऑगस्ट महिना होता. बीकानेरचे राजा सूरत सिंह यांनी चुरू किल्ल्यावर हल्ला केला होता. इकडे ठाकूर शिवजी सिंह जोरदार मुकाबला करत होते. पण काही दिवसांनी त्यांच्याकडील गोळा-बारूद संपलं.

युद्ध सुरू असतानाच गोळा-बारूद संपल्याने राजाची चिंता वाढली.  मात्र, प्रजेने त्यांना भरपूर साथ दिली आणि राज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने देऊन टाकले. या दागिन्यांपासून तोफ गोळे तयार करण्यात आले. ठाकूर शिवजी सिंह यांनी सैनिकांना आदेश दिले की, दुश्मनांवर तोफांमधून चांदीचे गोळे टाका.  याचा परिणाम असा झाला की, दुश्मनांच्या सेनेने हार मानली आणि ते तेथून पळून गेले. ही घटना चुरूच्या इतिहासात अमर आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास