शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एक अजब रेल्वे स्टेशन, जे दोन राज्यात वाटलं गेलंय; प्लॅटफॉर्मवर चालता चालता बदलतं राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:25 IST

Interesting Facts : भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची काही ना काही खासियत आहे. ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण आपल्याला हे माहीत आहे का की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात विभागलं गेलं आहे.

Interesting Facts : देशात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. जास्तीत जास्त लोकांची पसंती रेल्वेच्या प्रवासालाच असते. कारण हा प्रवास स्वस्तही असतो आणि आरामदायकही असतो. सोबतच रेल्वेचा प्रवास एक वेगळा अनुभव देणारा सुद्धा असतो. लांबचा प्रवास देखील आरामदायी होतो. भारतात रेल्वेचं जाळं आणखी वाढलं आहे. देशातील रेल्वे सेवा जगातील चौथी सगळ्यात मोठी रेल्वे सेवा आहे. रेल्वेमध्ये अनेक आधुनिक बदल केले जात आहेत. जेणेकरून लोकांना अधिक सुविधा मिळाल्या आणि त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. पण लोकांना रेल्वेबाबत अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची काही ना काही खासियत आहे. ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण आपल्याला हे माहीत आहे का की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात विभागलं गेलं आहे. ते कोणतं स्टेशन हे जाणून घेऊ.

कोणतं स्टेशन दोन राज्यात विभागलं?

देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं ट्वीट

देशातील या वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट २०२० मध्ये केली. त्या पोस्टमध्ये या स्टेशनचा आणि स्टेशनवरील बेंचचा एक फोटो आहे. हा बेंच दोन राज्यात विभागला आहे. सोबतच त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, हे रेल्वे स्टेशन सूरत - भुसावळ मार्गावर आहे. या स्टेशनचा अर्धा भाग गुजात तर अर्धा भाग महाराष्ट्रात आहेत.

रेल्वे स्टेशन नसलेलं एकुलतं एक राज्य

देशातील सिक्कीम हे एक असं राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही आणि ना इथे कोणती रेल्वे लाइन आहे. हे देशातील एकुलतं एक असं राज्य आहे, जिथे रेल्वे नेटवर्क आजपर्यंत पोहोचलेलं नाही. पण सिक्कीम रेल्वे लाइनचं काम जोरात सुरू आहे. सिवोक–रांगपो रेल्वे प्रकल्प हा येथील मुख्य प्रकल्प आहे. ज्यामुळे सिक्कीम प्रथमच भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. हा प्रकल्प जवळपास ४४.९६ किमी लांब आहे.

हा रेल्वे प्रकल्प आता अधिक आव्हानात्मक भूप्रदेशातून बनवला जात आहे. अनेक भुयारं, पुलं आणि इंजिनिअरिंग कार्य आवश्यक आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट सिक्कीममधील रांगपो ला प्रथम रेल्वे स्टेशन बनवण्याचं आहे. सध्याच्या माहितीनुसार, प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षित वेळ २०२७ पर्यंत आहे, आणि त्यानंतरच सिक्कीममध्ये रेल्वे सेवा वास्तवात सुरू होईल अशी शक्यता आहे.

भारतात किती रेल्वे स्टेशन?

अनेक राज्यातील गावा-खेड्यांमध्ये रेल्वे थांबते. अनेक छोटे छोटे रेल्वे स्टेशन नेहमीच चर्चेत असतात. देशात एकूण ७ हजार ३०० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. भारतात रोज १३ हजार ते १४ हजार प्रवासी रेल्वे आणि ९ हजार मालगाड्या धावतात. म्हणजे एकूण रोज २० हजारांच्या आसपास रेल्वे धावतात. ज्या ७ हजार ३०० स्टेशन कव्हर करतात. इतकंच नाही तर भारतात रोज साधारण २.४ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. इतका मोठा आवाका असूनही देशात एक असं राज्य आहे, जिथे अजिबात रेल्वे पोहोचलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Indian Railway Station Straddling Two States: A Journey Across Borders

Web Summary : Navapur Railway Station uniquely sits between Maharashtra and Gujarat. Half the station is in Nandurbar district, Maharashtra, the other in Tapi, Gujarat. Sikkim remains the only Indian state without a railway network, though construction is underway.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे