शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

रोज साबणाने आंघोळ करणाऱ्यांनो देशातील पहिल्या स्वदेशी साबणाबाबत माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 12:32 IST

देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.

लोक रोज अंगावर साबण घासून घासून आंघोळ करतात. शरीर स्वच्छ आणि सुंगधित ठेवायचं असेल तर साबण तर लावावंच लागेल. पण कधी साबणाचा वापर करताना तुम्ही याच्या इतिहासाचा विचार केलाय? म्हणजे भारतात पहिलं साबण कधी आलं आणि कोणत्या कंपनीने लॉन्च केलं होतं. देशातील पहिला साबण कसा दिसत होता. इत्यादी...इत्यादी. जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या साबणाबाबत सांगणार आहोत.

स्वातंत्र्याआधी देशात साबणाचा पहिला स्वदेशी कारखाना जमशेदजी टाटा यांनी सुरू केला होता. जमशेदजी टाटा यांनी १९१८ मध्ये कोच्चिमध्ये Tata Oil Mills चा कारखाना सुरू केला होता. १९३० मध्ये टाटा कंपनीने मार्केटमध्ये पहिला साबण आणला होता. त्या साबणाचं नाव होतं 'OK'. भारतातील पहिला आंघोळीचा साबण OK.

टाटा ग्रुपने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग प्लानिंग केलं होतं. साबण चांगला होता आणि त्याची जाहिरातही जबरदस्त होती. मात्र, इतकं ब्रांडिंग करूनही भारतातील पहिला स्वदेशी साबण भारतात टिकू शकला नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार त्यावेळी लोक सुगंधित साबणाचा वापर कमी करत होते. जास्तीत जास्त लोक बेसन सारख्या देशी गोष्टींचा आंघोळीसाठी वापर करत होते. सोबतच मार्केटमध्ये Lifebuoy साबणही होताच. कमी किंमतीचा Lifebuoy साबण टाटाच्या ब्रॅन्डला टक्कर देत होता. OK आल्यानंतर Lifebuoy आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली.

कमी पैशात Lifebuoy लोकांना शरीरावरील कीटाणू मारणारं प्रॉडक्ट देत होते. तेच OK जाहिरातीतून लोकांचं लक्ष आकर्षित करत होता. पण हे जास्त दिवस चाललं नाही. त्यावेळी साबणावर इतके पैसे खर्च करण्याचा कुणाचा विचारही नव्हता. त्यामुळे भारतीय लोक Lifebuoy कडे वळत होते. तर काही लोक त्यांच्या देशी जुगाडांनी आनंदी होते.

याच कारणांनी टाटा ब्रॅन्डचा OK साबण मार्केटमध्ये आपली जागा बनवू शकला नव्हता. त्यानंतर हा साबण मार्केटमधून पूर्णपणे गायब झाला.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेTataटाटा