शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एक असं गाव जिथे राहतो केवळ एक परिवार, कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:19 IST

आज आम्ही तुम्हाला भारताच्या एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे केवळ एकच परिवार राहतो. 

भारत विविधतेने नटलेला देश आहे. इथे तुम्हाला प्रत्येक राज्यात असं काही वेगळं बघायला मिळतं जे देशाबाबत तुमचा दृष्टीकोन बदलतं. कुठे तुम्हाला फार जास्त लोकसंख्या बघायला मिळेल तर कुठे काहीच नाही. काही ठिकाणी तर प्राणीही दिसत नाहीत. तरीही भारत देश खास आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे केवळ एकच परिवार राहतो. 

भारताच्या या गावाचं नाव बर्धनारा नंबर-2 (No 2 Bardhanara). याच नावाचं आणखी एक गाव आहे ज्याचं नाव बर्धनारा नंबर-1 आहे. हे गाव आसामच्या नालबारी जिल्ह्यात येतं. काही वर्षाआधी आसामच्या एका मुख्यमंत्र्याने गावात एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. पण तो रस्ता आता राहिला नाही. हा एकच रस्ता गावाला मुख्य शहरासोबत जोडत होता. पण आता तोही नाही.

काही दशकांआधी या गावात बरेच लोक राहत होते. 2011 च्या जनगणनेमुसार, नंबर 2 बर्धनारा गावात 16 लोक राहत होते. पण आता ती संख्या आणखी कमी झाली झाली आहे. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, या गावात केव एकच परिवार राहतो. ज्यात 5 सदस्य आहेत. लोक इथून निघून गेले कारण या गावात रस्ते नव्हते. पावसाळ्यात लोकांना खूप समस्या होत होत्या. आजही या गावात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात नावेच्या मदतीने प्रवास करावा लागतो.

इथे राहणाऱ्या परिवाराच्या कुटुंब प्रमुखाचं नाव बिमल डेका आहे. तो त्याची पत्नी अनीमा, तीन मुले नरेन दिपाली आणि सियुतीसोबत गावात राहतो. रिपोर्ट्सनुसार, बिमल डेकाच्या मुलांनी सांगितलं की, त्यांना शाळेत जाण्यात चिखलातून 2 किमी पायी चालत जावं लागतं. पावसाळ्यात नावेने जावं लागतं.

इतक्या वाईट स्थितीत राहूनही बिमल यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आहे. दिपाली आणि नरेन यांनी पदवी मिळवली आहे तर सियुती 12वी मध्ये आहे. त्यांचं मत आहे की, प्रशासन गावाकडे लक्षच देत नाहीत. त्यामुळे गावाची स्थिती बिघडली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स