शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना 'हे' काम करू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:47 IST

Indian Railway Night Rules : या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

नवी दिल्ली : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) वेळोवेळी अनेक अपडेट आणत असते. नुकतेच भारतीय रेल्वेने रात्रीच्या प्रवासासाठी काही नियम जाहीर केले आहेत. या नियमांचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे तुम्हीही अनेकदा रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या गाइडलाइननुसार रात्री १० वाजल्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये एखादा प्रवासी आवाज करताना, गाणी गाताना, जोरात बोलताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे, भारतीय रेल्वेने टीटीई, ऑन बोर्डिंग स्टाफ, कॅटरिंग कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना यामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी कोणते नियम ठरवले आहेत ते जाणून घेऊया...

रात्री प्रवास करतेवेळी हे नियम...- रात्रीच्या वेळी कोणीही मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही.- मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास मनाई आहे.- ट्रेनचा लाइट सोडून तर रात्री १० वाजल्यानंतर इतर कोणताही लाइट लावण्याची परवानगी नाही.- टीटीई रात्री १० नंतर तिकीट तपासू शकत नाही.- ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० नंतर बोलता येणार नाही.- रात्री १० वाजल्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी मनाई आहे.- ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.- लाइटर, मॅच किंवा कोणत्याही ज्वलनशील पदार्थांना परवानगी नाही.

मिडल बर्थसाठी काय आहे नियम?दुसरीकडे, १० वाजल्यानंतर लोअर बर्थवर जर एखादा प्रवासी बसला असेल तर त्याला सांगून तुम्ही मिडल बर्थ उघडू शकता. यासाठी सकाळी १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मिडल बर्थ उघडण्याचा नियम आहे. यासाठी कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे