शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 18:11 IST

भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत....

देशातील बरेच  लोक ट्रेनने नेहमीच प्रवास करतात. भारतात ट्रेनला देशाची  लाइफलाईन म्हटलं जातं. ट्रेनन लाखो लोक रोज एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. ट्रेनने प्रवास करण्याआधी जिथे जायचंय त्या ठिकाणचं तिकीट काढावं लागतं. पण भारतात काही स्टेशन असेही आहेत ज्यांना नावच नाहीत. या निनावी स्टेशनवर रोज ट्रेन थांबतात, लोक त्यात बसतात आणि पुढे जातात. भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत....

भारतात २ रेल्वे स्टेशन अशी आहेत ज्यांना नाव नाही. एक पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील बांकुरा-मेसग्राम रेल्वे मार्गाववर आहे. तर दुसरं झारखंडच्या रांची-टोरी मार्गावर आहे. या दोन्ही स्टेशन्सना अजूनही नाव  का दिले नाहीत. यामागचणी कहाणीही रोमांचक आहे.

पश्चिम बंगालच्या बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाइवर असलेल्या नाव नसलेलं स्टेशन २००८ मध्ये तयार करण्यात आलं होतं. स्टेशन तयार केल्यावर त्याचं नाव रैनागढ ठेवण्यात आलं. पण या नावाला गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी याबाबत तक्रार केली. तेव्हापासून या स्टेशनचा वाद सुरूच आहे. हे एक मोठं कारण आहे की, आतापर्यंत या स्टेशनला कोणतंही नाव मिळालं नाही. (हे पण वाचा : यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले)

तेच दुसरीकडे झारखंडच्या रांचीहून जेव्हा टोरी लाइनवर येता तेव्हा मधे एक असं स्टेशन येतं, ज्याला नाव नाही. या स्टेशनला नाव नसण्यामागेही एक रोमांचक किस्सा आहे. २०११ मध्ये जेव्हा या रेल्वे स्टेशनवर रेल्वेला सुरूवात करण्यात आली तेव्हा याचं नाव  बडकी चांपी ठेवण्यात आलं होतं.

या नावालाही स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले की, त्यांनी हे स्टेशन उभं करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.  त्यामुळे स्टेशनला कमले असं नाव असायला हवं. तेव्हापासून या स्टेशनला नावच नाही. रिपोर्टनुसार रेल्वे स्टेशनचे अधिकार रजिस्टरवर या स्टेशनचं नाव बडकी चांपी असंच लिहितात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे