शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

भाजीत टोमॅटो टाकले म्हणून पत्नी घर सोडून गेली, मदतीसाठी पती पोलिसांच्या दारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:28 IST

Tomato News : टिफिन सेंटर चालवणाऱ्या संजीव वर्मन याने जेवण बनवताना भाजीमध्ये टोमॅटो टाकले. पण यामुळे त्याची पत्नी नाराज झाली आणि मुलीला घेऊन ती घर सोडून गेली.

Tomato News : सध्या टोमॅटोचे भाव काहीच्या काही वाढल्याने त्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाले आहेत. अशात मध्य प्रदेशच्या शहडोलमधून टोमॅटोसंबंधी एक वेगळीच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे पती-पत्नीमधील वाद टोमॅटोमुळे इतका वाढला की, पत्नी रागाच्या भरात घर सोडून आपल्या बहिणीकडे गेली. पीडित पतीच्या तक्रारीनंतर पोलीस दोघातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टिफिन सेंटर चालवणाऱ्या संजीव वर्मन याने जेवण बनवताना भाजीमध्ये टोमॅटो टाकले. पण यामुळे त्याची पत्नी नाराज झाली आणि मुलीला घेऊन ती घर सोडून गेली. पतीने पत्नीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. इतकंच नाही तर संजीवने टोमॅटो न खाण्याची शपथही घेतली. पण ती गेली. 

ती घर सोडून गेल्यावर संजीवने तिला शोधण्यासाठी पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला पत्नी आरतीचा नंबर मागितल्यावर त्याने दिला. तेव्हा पोलिसांनी संपर्क केला तर आरतीने सांगितलं की, ती तिच्या बहिणीच्या घरी उमरियामध्ये आहे.

त्यानंतर पोलिसांनी संजीवचंही पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पोलीस दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. संजीव एक छोटा ढाबा चालवतो आणि सोबतच लोकांना टिफिनही पुरवतो.

पोलिसांनी सांगितलं की, आरती वर्मनला संपर्क केला तर तिने सांगितलं की, संजीव तिच्यासोबत दारू पिऊन मारहाण करतो. यावरूनच ती नाराज आहे. याच कारणाने ती 4 वर्षाच्या मुलीला घेऊन बहिणीच्या घरी निघून गेली. तेच संजीव म्हणाला की, वादाचं खरं कारण टोमॅटोच आहे. संजीव आणि आरतीचं लग्न 8 वर्षाआधी झाल्याचं समजतं.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके