शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

भारतातील 'हे' रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे ४२ वर्ष ठेवलं होतं बंद, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:39 IST

देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कुणालाही विचित्र वाटेल. त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्षे झाली होती.

देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कुणालाही विचित्र वाटेल. त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्षे झाली होती. अनेकांना ही गंमतही वाटू शकते, पण ही गंमत नाही तर खरं आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

(Image Credit : railnews.in)

हे रेल्वे स्टेशन १९६० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. रेल्वे सेवा सुरू झाल्यावर काही वर्षे या स्टेशनवर सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक एक विचित्र घटना घडू लागली. १९६७ मध्ये बेगुनकोडोर रेल्वे स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचं भूत पाहिल्याचा दावा केला होता. सोबतच अशीही अफवा पसरली होती की, याच स्टेशनवर या मुलीचा एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगण्याचा प्रयत्नही केला, पण लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं.

(Image Credit : indianexpress.com)

पण खरी अडचण तेव्हा वाढली जेव्हा बेगुनकोडोरचे स्टेशन मास्टर आणि त्यांचा परिवात रेल्वे क्वार्टरमध्ये मृत आढळले. नंतर येथील लोकांनी असाही दावा केला होता की, त्यांच्या मृत्यूमागे त्याच महिलेच्या भूताचा हात आहे. लोक सांगू लागले होते की, जेव्हा एखादी रेल्वे येथून जाते तेव्हा त्या मुलीचं भूतही रेल्वेसोबत धावू लागतं. 

(Image Credit : thebetterindia.com)

या विचित्र घटनांनंतर बेगुनकोडोर हे रेल्वे स्टेशन चांगलंच चर्चेत आलं आणि हेच रेल्वेच्य रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे. लोकांमध्ये या मुलीच्या कथित भूताची इतकी भिती पसरली की, लोक स्टेशनवर येणं बंद झालं. इतकेच नाही तर स्टेशनवरील कर्मचारीही भीतीमुळे पळून जात होते.

(Image Credit : indiarailinfo.com)

असे मानले जाते की, जेव्हाही एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याची पोस्टिंग इथे होत होती, ते लगेच इथे येण्यास नकार देत होते. नंतर तर इथे रेल्वे थांबणंह बंद झालं. कारण भीतीमुळे कुणाला इथे उतरायचं देखील नव्हतं आणि ना कुणी रेल्वेत बसण्यासाठी येत होते. त्यानंतर संपूर्ण स्टेशन सामसूम झालं.

(Image Credit : timesofindia.indiatimes.com)

असे म्हणतात की, या रेल्वे स्टेशनवरील कथित भूताची चर्चा पुरूलिया जिल्ह्यापासून ते कोलकाता आणि पुढे रेल्वे मंत्रालयापर्यंत झाली होती. असेही सांगितले जाते की, जेव्हा येथून एखादी रेल्वे जात होती तेव्हा लोको पायलट स्टेशन येण्याआधीच स्पीड वाढवत होते. तसेच लोकही स्टेशन येण्याआधीच दारं-खिडक्या लावून घेत होते.

तब्बल ४२ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये गावातील लोकांच्या मागणीवरून तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हे रेल्वे स्टेशन सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत भूताचा असा काही दावा करण्यात आलेला नाही. पण आजही लोक सायंकाळी या स्टेशनवर जाणे टाळतात. सध्या इथे १० रेल्वे थांबतात. या स्टेशनची इतकी चर्चा झाली होती की, लोक त्यामुळेच हे स्टेशन बघण्यासाठीही येतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे