शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

आधी आमदार बनले मग राजकारणाला रामराम करत न्यायव्यवस्थेत परतले अन् न्यायाधीश झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:55 IST

नुकतेच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. निकम यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी राजकारणातून न्यायव्यवस्थेत पुन्हा एन्ट्री घेतली. 

नवी दिल्ली - भारतीय न्यायव्यवस्था आणि राजकारण यांचं खूप जवळचं नातं आहे. अनेकदा न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. मात्र काही असे नेते आहेत ज्यांनी राजकारणातून न्यायव्यवस्थेत जात स्वत:चं नशीब आजमावलं आणि मुख्य न्यायाधीशाच्या खुर्चीतही बसले. त्यातीलच एक न्यायाधीश फेरडिनो रेबेलो (Ferdino Rebello) जे आधी आमदार बनले त्यानंतर न्यायाधीश आणि मग मुख्य न्यायमूर्तीही झाले.

फेरडिनो रेबेलो यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४९ साली झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या गर्वनमेंट लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. याठिकाणी एलएलबीची पदवी घेतल्यानंतर जुलै १९७३ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. वकिलीच्या काळात रेबेलो यांचं राजकारणातही विशेष स्वारस्य होतं. त्यानंतर त्यांनी थेट जनता पार्टीत प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली.

रेबेलो यांनी १९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर गोवा इथं विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते जिंकले. १९८९ मध्ये रेबेलो हे जनता पार्टीच्या तिकिटावरच लोकसभा निवडणुकीत उभे राहिले. परंतु यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकीय पराभवानंतर ते पुन्हा वकिलीकडे वळले. न्या. रेबेलो १९८२ पर्यंत पणजीच्या ज्यूडिशियल कमिश्नर कोर्टात प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या पणजी बेंचमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. त्याठिकाणी ते बरेच चर्चेत आले. विशेषत: संविधानिक कायदे आणि सर्व्हिस प्रकरणात त्यांनी अनेक खटले जिंकले. 

१९९४ साली रेबेलो हे गोवा हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षही बनले. १९९५ साली त्यांना सिनिअर वकील बनवण्यात आलं. त्यानंतर १५ एप्रिल १९९६ साली रेबेलो यांना मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. जवळपास २ वर्षानंतर एप्रिल १९९८ साली ते कायमस्वरुपी न्यायाधीश बनले. मुंबई हायकोर्टात १२ वर्ष सेवा दिल्यानंतर २०१० साली रेबेलो यांची बदली इलाहाबाद हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली. २६ जून २०१० ते ३० जुलै २०११ पर्यंत ते तिथे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. 

आणखीही बरेच उदाहरणं

राजकारण सोडून न्यायव्यवस्थेत आलेले न्या. रेबेलो एकमेव नाहीत तर न्यायाधीश आफताफ आलम यांचीही कहाणी प्रसिद्ध आहे. ते सीपीआयचे सदस्य होते, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. काही काळानंतर काँग्रेसचा राजीनामा देत पुन्हा वकिली क्षेत्राकडे वळले. हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. गुजरातमधील प्रसिद्ध शोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसचा खटल्यामुळे ते न्या. आफताफ आलम चर्चेत आले होते. तेव्हा ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत मोर्चा उघडला होता.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय