शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:45 IST

जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो.

भारतीय रेल्वे ही आशिया खंडातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. तर जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. एका आकडेवारीनुसार, 2015-16  या एका वर्षात तब्बल 8 अब्जपेक्षा जास्त लोकांनी रेल्वे प्रवास केला होता. तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल पण काय कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा अर्थ जाणून घेऊ.

* देशभरात 5 हजार ते 8 हजार 500 रेल्वे स्टेशन आहेत. या स्टेशनवरून साधारण 22 मिलियन लोक रोज प्रवास करतात. या रेल्वे स्टेशन्सना मुळात चार भागांमध्ये विभागलं गेलं आहे.

– टर्मिनस– सेन्ट्रल– जंक्शन– स्टेशन

काय असतं टर्मिनस किंवा टर्मिनल ?

टर्मिनस किंवा टर्मिनल याचा अर्थ होतो की, एक असं स्टेशन जेथून रेल्वे पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिशेने रेल्वे त्या स्टेशनला पोहोचते, तेथून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी त्याच दिशेने पुन्हा उलटा प्रवास रेल्वेला सुरू करावा लागतो.

उदाहरण:

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)लोकमान्य टिलक टर्मिनस (एलटीटी)कोचीन हार्बर टर्मिनसअशाप्रकारचे भारतात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत.

सेन्ट्रल

सेंट्रल त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, ज्यात अनेक स्टेशनचा समावेश असतो. हे शहरातील सर्वात व्यस्त स्टेशन असतं. अनेकजागी जुन्या स्टेशन्सनाही सेंट्रल म्हटलं जातं. भारतात असे एकूण 5 सेन्ट्रल स्टेशन आहेत.

उदाहरण:

मुंबई सेन्ट्रल (बीसीटी)चेन्नई सेन्ट्रल (एमएएस)त्रिवेंन्द्रम सेन्ट्रल (टीवीसी)मैंग्लोर सेन्ट्रल (एमएक्यू)कानपुर सेन्ट्रल (सीएनबी)

जंक्शन

जंक्शन त्या रेल्वे स्टेशनला म्हटलं जातं, जेथून रेल्वेच्या येण्या-जाण्यासाठी कमीत कमी 3 पेक्षा जास्त वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे रेल्वे कमीत कमी एकत्र दोन रूटवरून येऊ शकते आणि जाऊही शकते.

उदाहरण:

मथुरा जंक्शन (7 मार्ग)सलीम जंक्शन (6 मार्ग)विजयवाड़ा जंक्शन (5 मार्ग)बरेली जंक्शन (5 मार्ग)

स्टेशन

स्टेशन त्या जागेला म्हटलं जातं जेथे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सामानासाठी थांबते. भारतात एकूण 8 ते साडे आठ हजार स्टेशन आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स