शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विमानाला पाण्याने सलामी कधी आणि का दिली जाते? तुम्हाला काय वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:06 IST

विमानाबाबतच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये बघायला मिळते. अशीच विमानाबाबतची खास बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विमानाबाबतच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये बघायला मिळते. अशीच विमानाबाबतची खास बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विमानावर अग्नीशमन दलाच्या बंबाने पाणी सोडलं जातं. तुम्हाला प्रश्न पडेल की, असं का केलं जातं. तर याला म्हणतात, 'वॉटर सल्यूट'. अनेकांना असं वाटत असेल की, विमान थंड करण्यासाठी असं केलं जातं. पण तो एक गैरसमज आहे.

'वॉटर सल्यूट'चं कारण

अनेकांना असं वाटतं की,  वॉटर सल्यूट हा विमानाला थंड करण्याच्या उद्देशाने दिला जातो. पण मुळात विमान हे १२ हजार फूट उंचीवर उडतात. इतक्या उंचीवर वातावरण फार थंड असतं. त्यामुळे विमान थंड करण्यासाठी पाणी सोडलं जातं, यात काहीच तथ्य नाही. वॉटर सल्यूट करण्याचा उद्देश हा सन्मान करण्याचा असतो. 

कशी झाली सुरूवात?

विमानांआधी सर्वात जास्त वापर हा जहाजांचा केला जात होता. समुद्र मार्गानेच जगभरात प्रवास केला जात होता. त्यावेळी असं चलन होतं की, जेव्हाही एखादं नवीन जहाज समुद्रात उतरत असेल तर त्याच्यावर पाण्याचा वर्षाव करून स्वागत केलं जायचं. ही प्रथा पुढे विमानांसाठीही केली जाऊ लागली.

विमानाचं स्वागत आणि रिटायरमेंट

विमानाला दोनदा वॉटर सल्यूट दिला जातो. एक म्हणजे जेव्हा एखादं विमान एखाद्या विमानतळावरून पहिल्यांदाच उड्डाण घेत असेल तेव्हा असं केलं जातं. तर दुसरं कारण म्हणजे जर विमानाच्या कॅप्टनच्या रिटायरमेंटवेळी विमानावर पाण्याचा वर्षाव केला जातो. म्हणजेच वॉटर सल्यूट दिला जातो.

टॅग्स :airplaneविमानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके