शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 11:19 IST

पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

कोरोना काळात बहुतेक परिवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मात्र, या काळातही एका परिवाराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. कारण  १६ वर्षापूर्वी हरवलेला घरातील सदस्या अचानक सापडला. ही घटना मध्य प्रदेशच्या बैतूलमधील आहे. येथील एक व्यक्ती मानसिक आजारी आहे आणि तो कुठेही फिरत होता. पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तर समजलं की, तो कटनी जिल्ह्यातील राहणाारा आहे आणि १६ वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

घरातील लोक इतकी वर्ष त्याला मृत समजत होते. त्या व्यक्तीची बुधवारी  बैतूल पोलिसांनी परिवारासोबत भेट घडवून आणली. ही व्यक्ती बेवारसपणे कुठेही रस्त्यांवर फिरत राहत होती. बैतूलच्या चक्कर रोडवर जेव्हा ४५ वर्षीय व्यक्तीसोबत पोलीस बोलले तर तो कटनी जिल्ह्यातील राहणारा असल्याचं समजलं.  त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मात्र, त्याला घराचा पत्ता लक्षात होता. जेव्हा त्याच्या गावात संपर्क केला गेला तर समजलं की, तो १६ वर्षांपासून गायब आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर तो परिवाराला पुन्हा भेटू शकला. 

सुरेश पटेल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा फोटो जेव्हा परिवाराला दाखवण्यात आला तेव्हा एका क्षणात त्याला ओळखलं गेलं. त्याची बहीण अंजू त्याला घेण्यासाठी बैतूला पोहोचली तर तिच्यावर भाऊ पुन्हा भेटल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

असे सांगितले जात आहे की, सुरेशचं पत्नी आणि सासरच्या लोकांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भांडण झालं होतं. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर तो घर सोडून गेला. खूपदा शोध घेऊनही तो कुणाला सापडला नाही. दोन मुलांचा वडील सुरेश १६ वर्षांपासून इकडे-तिकडे भटकत होता. मानसिक स्थिती ठीक नसल्याने घरीही पोहोचू शकत नव्हता. काही महिन्यांनी घरातील लोकांनी त्याला मृत समजलं आणि त्याचा शोध थांबवला. 

पोलिसांच्या मदतीने त्याची बहीण अंजू पटेल त्याला घ्यायला आली तर ती भावाला बघून भावूक झाली. महिला आपल्या भावाला घेऊन गावी गेली. अंजू पटेल म्हणाली की, हा आमचा मोठा भाऊ आहे. १६ वर्षांपासून बेपत्ता होता. सासरी पैशांवरून वाद झाला होता. त्याला मारहाण केली होती. त्यात त्याची मानसिक स्थिती बिघडली. आम्ही त्यांचा खूप शोध घेतला. पण सापडला नाही. आज बैतूल पोलिसांमुळे भाऊ भेटला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके