शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 10:28 IST

इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.

(Image Credit : Aajtak)

कोरोनाच्या थैमानात अनेक विचित्र किंवा अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणांहून आधी मृत घोषित केलेले अनेक लोक ऐन चितेवर टाकल्यावर जिवंत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्मशानभूमीत डॉक्टर पोहोचले आणि अॅम्बुलन्सही. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. पण तरीही परिवारातील लोक मानायला तयार नव्हते. ते मृत व्यक्तीला पुन्हा जिल्हा रूग्णालयात घेऊन गेले. तिथेही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हे पण वाचा : बेटा अज्जू, चाय पिला दे....; मृत आजी अचानक बोलू लागली; सगळ्यांची उडाली घाबरगुंडी)

ही घटना अशोक नगरमधील आहे. अनिल जैन नावाच्या व्यक्तीची तब्ये बिघडल्याने त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. साधारण १५ दिवसांपासून तो हॉस्पिलमध्ये भरती होता. मृतकाच्या भावाने सांगितलं की, त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि गुरूवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण जेव्हा आम्ही त्याला स्मशानभूमीत घेऊन गेलो तेव्हा त्याच्या शरीरात हालचाल झाली आणि ओम, ओम असा आवाजही आला. इतकंच नाही तर तो चितेवरून उठून बसला.

त्यानंतर तिथे डॉक्टरांची टीम आली. त्यांनी अनिल जैनला मृत घोषित केलं. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्ती जिवंत होता. कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आहेत. 

तेच सिव्हिल सर्जन म्हणाले की, हे चुकीचं सांगणं आहे की, तो जिवंत आहे. मृतकाला स्मशानभूमीतून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणल्यावरही चेक केलं गेलं. तेव्हाही ती व्यक्ती मृत होती. कुटुंबियांनी लावलेले आरोप निराधार आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या