शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

आजच्या दिवशीच भारताच्या शोधात निघाला होता कोलंबस, चुकून भलतीकडेच पोहोचला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 10:38 IST

कोलंबसने अमेरिकन बेटांना भारत मानलं आणि त्याला इंडीज असं नावही दिलं. कोलंबस चुकीचा होता. पण तो आयुष्यभर याचा गैरसमजासोबत जगला की, त्याने भारत शोधला.

इटलीचा नाविक क्रिस्टोफर कोलंबस आजच्याच दिवश भारताच्या शोधात समुद्रामार्गे निघाला होता. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, कोलंबसने १४९२ मध्ये आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, ही तारीख ३ ऑगस्ट होती. ३ ऑगस्ट १४९२ ला क्रिस्टोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाल आणि चुकून त्याने अमेरिकन बेटांचा शोध लावला.

कोलंबसने अमेरिकन बेटांना भारत मानलं आणि त्याला इंडीज असं नावही दिलं. कोलंबस चुकीचा होता. पण तो आयुष्यभर याचा गैरसमजासोबत जगला की, त्याने भारत शोधला. त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला हे कळू शकले नाही की, तो अमेरिकेला भारत समजून बसलाय. चला जाणून घेऊ कोलंबसच्या समुद्र प्रवासाची रोमांचक माहिती.

क्रिस्टोफर कोलंबसचा जन्म १४५१ मध्ये जिनोआमध्ये झाला होता. कोलंबसला पुढे समुद्र प्रवासांची चटक लागली आणि यालाच त्याने आपला रोजगार बनवलं. कोलंबसवेळी यूरोपमधील व्यापारी भारतासहीत आशियातील अनेक देशांमध्ये व्यापार करत होते. जमिनीमार्गे येऊन ते यूरोप देशांना आपला माल विकत होते आणि येथून मसाले घेऊन जात होते. इराण आणि अफगाणिस्तान मार्गे हा व्यापार होत होता. १४५३ मध्ये या भागात मुस्लिम तुर्कानी साम्राज्य स्थापित झालं. ज्यांनी यूरोपीय व्यापाऱ्यांचा मार्ग बंद केला. आशियातील यूरोपचा व्यापार बंद झाला. त्यामुळे व्यापारी हैराण झाले.

याचदरम्यान कोलंबसच्या मनात समुद्रामार्गे भारतात जाण्याचा विचार आला. हे कुणालाही माहीत नव्हतं की, तेथून भारत किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे. पण कोलंबसला त्याच्या ज्ञानावर विश्वास होता. त्याला विश्वास होता की, समुद्रात पश्चिमच्या मार्गाने गेलं तर भारतात पोहोचता येतं. पण त्याच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणारं कुणी नव्हतं.

कोलंबसला प्रवासासाठी पैशांची गरज होती आणि लोकही हवे होते. आपला विचार घेऊन तो पोर्तुगालचया राजाकडे गेला. पण राजाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर स्पेनच्या शासकांनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि प्रवासाचा खर्च उचलण्यासाठी तयार झाले. केवळ पैसा मिळून भागणार नव्हतं. कोलंबसच्या अडचणी काही कमी नव्हत्या. त्याच्यासोबत जाण्यासाठी कुणीही नाविक तयार नव्हता. कुणाचाही कोलंबसवर विश्वास नव्हता. त्यावेळी लोकांना वाटत होतं की, पृथ्वी चपटी आहे आणि ते समुद्रामार्गे प्रवासाला निघाले तर एक दिवस असा येईल जिथे समुद्र संपेल आणि ते खाली पडतील.

मोठ्या मुश्किलीने कोलंबसने ९० नाविक तयार केले. ३ ऑगस्ट १४९२ ला कोलंबसने तीन जहाजे घेऊन स्पेनमधून आपल्या प्रवासा सुरूवात केली. अनेक आठवडे झाले तर प्रवास काही संपला नाही. त्यामुळे  नाविक घाबरले होते. अनेक नाविक परत जाण्याचा विचार करत होते. पण कोलंबस तयार नव्हता. इतकेच नाही तर नविकांनी कोलंबसला जीवे मारण्याची धमकी देणेही सुरू केले होते. कोलंबसने कसंतरी त्यांना काही दिवस प्रवास करण्यासाठी तयार केलं.

९ ऑक्टोबर १४९२ ला कोलंबसला आकाशात पक्षी दिसू लागले. त्याने त्या दिशेनेच जहाजे वळवण्यास सांगितली. १२ ऑक्टोबर १४९२ ला कोलंबसची जहाजे जमिनीवर पोहोचली. कोलंबसला वाटलं तो भारतात पोहोचला. पण तो बहामासचं बेट सॅन सल्वाडोरला पोहोचला होता. कोलंबस तिथे ५ महिने थांबला. या काळात त्याने अनेक कॅरेबियन बेटांचा शोध लावला. ज्यात जुआना(क्यूबा) आणि हिस्पानिओलांचा समावेश होता.

कोलंबसला इथे बरीच संपत्ती मिळाली. आपले ४० माणसे तिथेच सोडून तो स्पेनला परत गेला. १५ मार्च १४९३ ला कोलंबस स्पेनला पोहोचला. त्याचं भव्य स्वागत झालं. स्पेनच्या राजाने त्याला त्याने शोधलेल्या देशांचं गव्हर्नर केलं. त्यानंतर मृत्यूआधी कोलंबसने तीन वेळा अमेरिकन बेटांचा प्रवास केला. पण त्याला शेवटपर्यंत हे माहीत नव्हतं की, ज्या देशाला त्याने शोधलं तो भारत नाही तर अमेरिका आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतAmericaअमेरिका